
Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'अमृत भारत स्टेशन' योजनेचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरातील तब्बल ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी त्यांनी पायाभरणी केली.
या कार्यक्रमात बोलताना पीएम मोदींनी सांगितले की, 'आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. देशातील १३०० रेल्वे स्थानकांपैकी ५०८ अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यावर २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.'
'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत पंतप्रधानांनी देशातील वेगवेगळ्या प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुर्निकासाच्या कामांचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. आतापर्यंत हा भारतीय रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाबाबतचा सर्वात मोठा निर्णय आहे. २७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५०८ रेल्वे स्थानकांचा या योजनेअंतर्गत पुनर्विकास होणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या विकासाठी जवळपास २४ हजार ४७० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी सांगितले की,'याचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 4500 कोटी रुपये खर्चून ५५ अमृत स्टेशन विकसित केले जाणार आहेत. राजस्थानमधील ५५ रेल्वे स्थानकही अमृत रेल्वे स्टेशन म्हणून विकसित होणार आहेत. रेल्वेमध्ये जेवढी कामं केली जात आहेत त्यामुळे सर्वांना आनंद आणि आश्चर्य वाटत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाचे आभार.'
|
|
'जगातील दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, यूके आणि स्वीडन यासारख्या देशांपेक्षा या 9 वर्षात आपल्या देशात जास्त रेल्वे रुळ टाकण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये एकूण जेवढे रेल्वे ट्रॅक आहेत ते गेल्या काही वर्षांमध्ये भारतात तयार करण्यात आले. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी उत्तम वेटिंग रूम तयार करण्यात येणार आहेत. त्याचसोबत, हजारो स्थानकांवर मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आह.', असं ही त्यांनी सांगितलं.
असा केला जाणार रेल्वे स्थानकांना पुनर्विकास -
- रेल्वे स्थानकांचा सिटी सेंटर म्हणून विकास केला जाणार.
- शहरांमधील दोन्ही टोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार.
- रेल्वे स्थनकांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार.
- अत्याधुनिक प्रवासी सुविधांना प्राधान्य दिले जाणार.
- उत्तम मालवाहू व्यवस्था आणि इंटरमॉडेल इंटीग्रेशन करण्यात येणार.
- एकसमान आणि सहाय्यक मार्गदर्शक चिन्हांचा समावेश.
- स्थानिक कला आणि संस्कृतीला प्राधान्य देण्यात येणार.
या राज्यातील इतक्या रेल्वे स्थानकांचा समावेश -
उत्तर प्रदेश - ५५ रेल्वे स्थानक
राजस्थान - ५५ रेल्वे स्थानक
बिहार- ४९ रेल्वे स्थानक
महाराष्ट्र - ४४ रेल्वे स्थानक
पश्चिम बंगाल - ३७ रेल्वे स्थानक
मध्य प्रदेश - ३४ रेल्वे स्थानक
आसाम - ३२ रेल्वे स्थानक
ओडिशा - २५ रेल्वे स्थानक
पंजाब - २२ रेल्वे स्थानक
गुजरात - २१ रेल्व स्थानक
तेलंगणा - २१ रेल्वे स्थानक
झारंखंड- २० रेल्वे स्थानक
आंध्र प्रदेश - १८ रेल्वे स्थानक
तामिळनाडू - १८ रेल्वे स्थानक
हरियाणा - १५ रेल्वे स्थानक
कर्नाटक - १३ रेल्वे स्थानक
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही






























Subscribe to my channel




