पुणे: नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात करण्यात आलेल्या बदलामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील विकासकामांना आणि परिसराच्या प्रगतीला मोठा फटका बसला आहे, असा गंभीर आक्षेप म्हाडाचे अध्यक्ष तथा पूर्व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर या परिसराचा शाश्वत विकास साधायचा असेल, तर पुणे-नाशिक रेल्वे तिच्या मूळ व सरळ मार्गावरूनच धावली पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.
नव्या मार्गामुळे शेतकऱ्यांवर अन्याय:
पुणे-नाशिक रेल्वेच्या नव्या मार्गाच्या घोषणेमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर आणि सिन्नर या तालुक्यांमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला मार्ग जुन्या आणि मूळ मार्गावरील सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांवर पूर्णपणे अन्यायकारक ठरणारा आहे, असा दावा आढळराव पाटील यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झालेला मूळ मार्ग बदलल्यामुळे या परिसरातील औद्योगिक आणि कृषी विकासाच्या गतेला मोठा ब्रेक लागला आहे.
मूळ मार्गच फायदेशीर आणि योग्य:
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मागील काही काळापासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. सुरुवातीला ठरलेला पुणे–चाकण–राजगुरूनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर हा मूळ आणि सरळ रेल्वे मार्ग अत्यंत सोयीचा होता. या सरळ मार्गामुळे औद्योगिक व ग्रामीण भागातील प्रवाशांना आणि दळणवळणाला मोठा फायदा होणार होता. मात्र, यात अनपेक्षित बदल केल्यामुळे प्रकल्पाचा मूळ उद्देश बाطित होत असल्याचा सूर त्यांनी लावला आहे.
सर्वपक्षीय आंदोलनाला पाठिंबा:
या महत्त्वपूर्ण विषयावर आणि रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी स्थानिक पातळीवर होणाऱ्या सर्वपक्षीय आंदोलनांना व प्रयत्नांना आपले पूर्ण समर्थन असेल, असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जर रेल्वे मार्ग सरळ आणि मूळ मार्गावरून नेला नाही, तर स्थानिक जनतेच्या हितासाठी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



