
PM Modi : लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा समोर आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भाजपच्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आजचा दिवस शुभ आहे. देशातील अनेक राज्यात नवीन वर्षाचा आनंद आहे. केरळ, तामिळनाडू, ओडिसा, बंगालमध्ये शुभ दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची पूजा करतो. आई कात्यायनीच्या दोन्ही हाती कमळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या शुभ दिनी भाजपचं संकल्पपत्र समोर ठेवलं आहे.
देशातील अनेक सक्रिय नागरिकांनी हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी सूचना पाठवल्या होत्या. विकसित भारताच्या ४ स्तंभावर हे संकलपत्र फोकस करत आहे. भाजपच्या संकल्पपत्रात युवा भारताच्या युवा संकल्पाची युवा आकांशा आहे. भाजपने दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण केलेली आहेत. सबका साथ सबका विकास हेच भाजप ध्येय असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तृतीयपंथीयांना प्रतिष्ठा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. १ कोटी लखपती दीदी बनल्या आहेत.आता ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी दिली आहे. गावच्या मुलींना पायलट बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
|
|
मोफत राशनची योजना पुढचे ५ वर्ष सुरू असेल. गरिबाच्या जेवणाच ताट त्याच्या मनाला समाधान देणार असेल, ही मोदींची गॅरंटी आहे. आयुष्मान भारतमध्ये मोफत उपचार मिळत राहतील. भाजपने संकल्प केला आहे, ७० वर्षाच्या पुढील व्यक्तीला आयुष्मान योजनेत आणल जाणार आहे. त्याला ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. महिला खेळाडूंना पुढे जाण्यासाठी विशेष सुविधा बनवल्या जाणार आहे. कॅन्सरमुक्तीसाठी योजना चालवणार आहे. ग्रामीण भागातील सगळ्यांना सशक्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पीएम किसान योजनेचा फायदा पुढे सुरू राहील. देशातील सहकारी संस्थांची संख्या वाढवली आहे. आत्मनिर्भरतेसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक प्रकारची मदत करेल. शेतकऱ्यांना मोतीच्या शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. भाजपचा संकल्प भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणारा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हटले आहेत.
परिवार वाढत असल्याने आणखी ३ कोटी घर बांधण्याचा संकल्प करत आहोत. पाईपने प्रत्येक घरी गॅस पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. मुद्रा योजनेतील निधीची मर्यादा २० लाख करण्यात येणार आहे. मोदींनी प्रधानमंत्री अवास योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला, (Politics) किसान योजनेचं योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला आणि छत्तीसगडच्या बस्तरमधून आलेल्या महिलेला उज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना संकल्प पत्र दिलं आहे. पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे.
पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे. अनेक लहान लहान अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही योजना तयार केल्या आहेत. 6G वर काम सुरू आहे. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन मिळतील यासाठी प्रयत्न करत आहोत. सोशल, फिजिकल, डिजिटलचा विस्तार करणार आहे.
अजेंडा तयार करण्यासाठी भाजपने नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने अनेक बैठका घेऊन जाहीरनामा अंतिम केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू आणि अर्जुनराम मेघवाल यांच्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि माजी केंद्रीय मंत्री रवींद्रभाई पटेल यांच्यासह एकूण २७ नेते सहभागी झाले होते. शंकर प्रसाद हे या समितीचे सदस्य आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




