कैलाश सत्यार्थी यांचा कॉलम:एआय तंत्रज्ञान घडवणाऱ्यांना ‎मानवतेची कितपत जाण ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता‎एआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.‎कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.‎आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिक‎दिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हा‎येथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170‎देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‎‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) ही‎संकल्पना मांडली.‎ एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनता‎व्यापक जनहितासाठी काम करावे, असे आपल्याला ‎‎खरोखर वाटत असेल, तर एआय अभियंते आणि ‎‎विकसकांना एक महिन्यासाठी त्यांच्या प्रयोगशाळांबाहेर ‎‎पाठवले पाहिजे. त्यांनी खाणी आणि कारखान्यांमध्ये‎काम करणाऱ्या बालकामगारांना भेटले पाहिजे.‎संघर्षामुळे विस्थापित कुटुंबांशी संवाद साधला पाहिजे. ‎‎गरिबी, भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्या ‎‎वंचित समाजघटकांसोबत काही काळ घालवला‎पाहिजे. त्यांचे आयुष्य तंत्रज्ञानापेक्षा अन्यायामुळे‎अधिक प्रभावित झाले आहे, अशा लोकांसोबत त्यांनी ‎‎चालले पाहिजे. केवळ एका महिन्याचा असा अनुभवही‎एखाद्या व्यक्तीची विचारसरणी बदलू शकतो आणि‎त्याचा परिणाम ते विकसित करत असलेल्या‎तंत्रज्ञानाच्या दिशेवर होऊ शकतो. एआयने शिक्षण,‎आरोग्यसेवा, उद्योग, प्रशासन आणि संशोधन या क्षेत्रांना‎आधीच नवे स्वरूप दिले आहे. मात्र प्रत्येक तांत्रिक‎क्रांती ही नैतिक परीक्षाही असते आणि एआय त्याला‎अपवाद नाही. आज आपल्या समोरचा सर्वात मोठा‎धोका म्हणजे आपण महत्त्वाचा प्रश्नच विसरत आहोत.‎तो म्हणजे ही बुद्धिमत्ता नेमकी कोणाच्या सेवेसाठी‎आहे? जागतिक स्तरावरील बहुतांश चर्चा नैतिक एआय‎व जबाबदार एआय याभोवती केंद्रित आहेत. मात्र‎अधिक सक्षम प्रशासन, अर्थपूर्ण उत्तरदायित्व आणि‎प्रभावी नियमन यांचीही गरज आहे. नैतिकता आपल्याला‎योग्य-अयोग्याची जाणीव करून देते. कायदे मर्यादा‎आखू शकतात, पण अब्जावधी लोकांच्या आयुष्यावर‎परिणाम करणारे तंत्रज्ञान घडवणाऱ्यांची मानसिकता‎बदलू शकत नाहीत. त्यासाठी अधिक खोल मूल्याची‎आवश्यकता आहे आणि ती म्हणजे करुणा. करुणा‎म्हणजे केवळ सहानुभूती, दयाळूपणा किंवा परोपकार‎नव्हे. ती या सर्वांपेक्षा वेगळी आहे. ती केवळ भावना‎किंवा अमूर्त नैतिक आदर्शही नाही. आपण दुसऱ्याचे‎दुःख स्वतःचे मानतो तेव्हा करुणेची सुरुवात तेव्हा होते.‎हीच भावना आपल्याला त्या व्यक्तीची वेदना कमी‎करण्यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करते. त्यासाठी‎आवश्यक धैर्यही करुणेतच असते. करुणा आपल्याला‎केवळ व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवण्याकडे नेत‎नाही, तर मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याची प्रेरणाही‎देते. करुणामूलक एआय इतर चौकटींपेक्षा वेगळे आहे,‎कारण त्याची सुरुवात तंत्रज्ञानापासून नव्हे, तर‎मानवतेपासून होते. एखादी प्रणाली काय करू शकते, हा‎प्रश्न विचारण्यापूर्वी ती कोणासाठी काम करते, हा प्रश्न ते‎विचारते. अधिक कार्यक्षमतेपूर्वी ते मानवी परिणामांचा‎विचार करते. नवकल्पनांचा उत्सव साजरा करण्यापूर्वी‎कोणी मागे तर राहणार नाही ना, याची खात्री करते.‎ आज एआयमधील अनेक त्रुटी—पूर्वग्रह, भेदभाव,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बहिष्कार, दिशाभूल करणारी माहिती, पर्यावरणीय हानी‎आणि बालकल्याणाला निर्माण होणारे धोके—यांना‎प्रगतीचे दुर्दैवी दुष्परिणाम म्हणून पाहिले जाते. मात्र त्या‎केवळ दुष्परिणाम नाहीत. त्या याचाही पुरावा आहेत की,‎या प्रणाली विकसित करताना मानवतेच्या हिताचा‎विचार करणारी व्यक्ती अनुपस्थित होती, तिच्याकडे‎दुर्लक्ष झाले किंवा तिचे मत ऐकले गेले नाही. सामाजिक‎माध्यमांचे दुष्परिणाम आपण आधीच अनुभवले आहेत.‎त्यामुळे एआय अर्थव्यवस्था कशी बदलेल, हा प्रश्न‎विचारण्यापेक्षा अल्गोरिदम दुसऱ्याच्या वेदना‎जाणण्याची मानवी क्षमता कमी करू लागतील, तेव्हा‎त्याचे परिणाम काय असतील, हा प्रश्न विचारणे अधिक‎आवश्यक आहे. एआयला वेदना ओळखण्याचे‎प्रशिक्षणच दिले गेले नसेल, तर तो न्यायाचे रक्षण करू‎शकेल का? जर त्याचे एकमेव उद्दिष्ट नफा वाढवणे‎असेल, तर तो शांततेला प्राधान्य देईल का? हे नैतिक‎प्रश्न तांत्रिक प्रश्नांपूर्वी विचारले गेले पाहिजेत. कारण‎मानवतेचे भविष्य घडवण्याची क्षमता त्यांच्यातच आहे.‎ (प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ एआय विकसकांनी आपल्या‎प्रयोगशाळांबाहेर पडून खाणी आणि‎कारखान्यांतील बालकामगारांना‎भेटले पाहिजे. विस्थापित कुटुंबांशी‎संवाद साधला पाहिजे आणि गरिबी,‎भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहन‎करणाऱ्या वंचित समाजघटकांमध्ये‎काही काळ घालवला पाहिजे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *