आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आताएआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिकदिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हायेथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) हीसंकल्पना मांडली. एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनताव्यापक जनहितासाठी काम करावे, असे आपल्याला खरोखर वाटत असेल, तर एआय अभियंते आणि विकसकांना एक महिन्यासाठी त्यांच्या प्रयोगशाळांबाहेर पाठवले पाहिजे. त्यांनी खाणी आणि कारखान्यांमध्येकाम करणाऱ्या बालकामगारांना भेटले पाहिजे.संघर्षामुळे विस्थापित कुटुंबांशी संवाद साधला पाहिजे. गरिबी, भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्या वंचित समाजघटकांसोबत काही काळ घालवलापाहिजे. त्यांचे आयुष्य तंत्रज्ञानापेक्षा अन्यायामुळेअधिक प्रभावित झाले आहे, अशा लोकांसोबत त्यांनी चालले पाहिजे. केवळ एका महिन्याचा असा अनुभवहीएखाद्या व्यक्तीची विचारसरणी बदलू शकतो आणित्याचा परिणाम ते विकसित करत असलेल्यातंत्रज्ञानाच्या दिशेवर होऊ शकतो. एआयने शिक्षण,आरोग्यसेवा, उद्योग, प्रशासन आणि संशोधन या क्षेत्रांनाआधीच नवे स्वरूप दिले आहे. मात्र प्रत्येक तांत्रिकक्रांती ही नैतिक परीक्षाही असते आणि एआय त्यालाअपवाद नाही. आज आपल्या समोरचा सर्वात मोठाधोका म्हणजे आपण महत्त्वाचा प्रश्नच विसरत आहोत.तो म्हणजे ही बुद्धिमत्ता नेमकी कोणाच्या सेवेसाठीआहे? जागतिक स्तरावरील बहुतांश चर्चा नैतिक एआयव जबाबदार एआय याभोवती केंद्रित आहेत. मात्रअधिक सक्षम प्रशासन, अर्थपूर्ण उत्तरदायित्व आणिप्रभावी नियमन यांचीही गरज आहे. नैतिकता आपल्यालायोग्य-अयोग्याची जाणीव करून देते. कायदे मर्यादाआखू शकतात, पण अब्जावधी लोकांच्या आयुष्यावरपरिणाम करणारे तंत्रज्ञान घडवणाऱ्यांची मानसिकताबदलू शकत नाहीत. त्यासाठी अधिक खोल मूल्याचीआवश्यकता आहे आणि ती म्हणजे करुणा. करुणाम्हणजे केवळ सहानुभूती, दयाळूपणा किंवा परोपकारनव्हे. ती या सर्वांपेक्षा वेगळी आहे. ती केवळ भावनाकिंवा अमूर्त नैतिक आदर्शही नाही. आपण दुसऱ्याचेदुःख स्वतःचे मानतो तेव्हा करुणेची सुरुवात तेव्हा होते.हीच भावना आपल्याला त्या व्यक्तीची वेदना कमीकरण्यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करते. त्यासाठीआवश्यक धैर्यही करुणेतच असते. करुणा आपल्यालाकेवळ व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवण्याकडे नेतनाही, तर मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याची प्रेरणाहीदेते. करुणामूलक एआय इतर चौकटींपेक्षा वेगळे आहे,कारण त्याची सुरुवात तंत्रज्ञानापासून नव्हे, तरमानवतेपासून होते. एखादी प्रणाली काय करू शकते, हाप्रश्न विचारण्यापूर्वी ती कोणासाठी काम करते, हा प्रश्न तेविचारते. अधिक कार्यक्षमतेपूर्वी ते मानवी परिणामांचाविचार करते. नवकल्पनांचा उत्सव साजरा करण्यापूर्वीकोणी मागे तर राहणार नाही ना, याची खात्री करते. आज एआयमधील अनेक त्रुटी—पूर्वग्रह, भेदभाव,बहिष्कार, दिशाभूल करणारी माहिती, पर्यावरणीय हानीआणि बालकल्याणाला निर्माण होणारे धोके—यांनाप्रगतीचे दुर्दैवी दुष्परिणाम म्हणून पाहिले जाते. मात्र त्याकेवळ दुष्परिणाम नाहीत. त्या याचाही पुरावा आहेत की,या प्रणाली विकसित करताना मानवतेच्या हिताचाविचार करणारी व्यक्ती अनुपस्थित होती, तिच्याकडेदुर्लक्ष झाले किंवा तिचे मत ऐकले गेले नाही. सामाजिकमाध्यमांचे दुष्परिणाम आपण आधीच अनुभवले आहेत.त्यामुळे एआय अर्थव्यवस्था कशी बदलेल, हा प्रश्नविचारण्यापेक्षा अल्गोरिदम दुसऱ्याच्या वेदनाजाणण्याची मानवी क्षमता कमी करू लागतील, तेव्हात्याचे परिणाम काय असतील, हा प्रश्न विचारणे अधिकआवश्यक आहे. एआयला वेदना ओळखण्याचेप्रशिक्षणच दिले गेले नसेल, तर तो न्यायाचे रक्षण करूशकेल का? जर त्याचे एकमेव उद्दिष्ट नफा वाढवणेअसेल, तर तो शांततेला प्राधान्य देईल का? हे नैतिकप्रश्न तांत्रिक प्रश्नांपूर्वी विचारले गेले पाहिजेत. कारणमानवतेचे भविष्य घडवण्याची क्षमता त्यांच्यातच आहे. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय विकसकांनी आपल्याप्रयोगशाळांबाहेर पडून खाणी आणिकारखान्यांतील बालकामगारांनाभेटले पाहिजे. विस्थापित कुटुंबांशीसंवाद साधला पाहिजे आणि गरिबी,भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहनकरणाऱ्या वंचित समाजघटकांमध्येकाही काळ घालवला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



