आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आताएआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिकदिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हायेथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) हीसंकल्पना मांडली. एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनताव्यापक जनहितासाठी काम करावे, असे आपल्याला खरोखर वाटत असेल, तर एआय अभियंते आणि विकसकांना एक महिन्यासाठी त्यांच्या प्रयोगशाळांबाहेर पाठवले पाहिजे. त्यांनी खाणी आणि कारखान्यांमध्येकाम करणाऱ्या बालकामगारांना भेटले पाहिजे.संघर्षामुळे विस्थापित कुटुंबांशी संवाद साधला पाहिजे. गरिबी, भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्या वंचित समाजघटकांसोबत काही काळ घालवलापाहिजे. त्यांचे आयुष्य तंत्रज्ञानापेक्षा अन्यायामुळेअधिक प्रभावित झाले आहे, अशा लोकांसोबत त्यांनी चालले पाहिजे. केवळ एका महिन्याचा असा अनुभवहीएखाद्या व्यक्तीची विचारसरणी बदलू शकतो आणित्याचा परिणाम ते विकसित करत असलेल्यातंत्रज्ञानाच्या दिशेवर होऊ शकतो. एआयने शिक्षण,आरोग्यसेवा, उद्योग, प्रशासन आणि संशोधन या क्षेत्रांनाआधीच नवे स्वरूप दिले आहे. मात्र प्रत्येक तांत्रिकक्रांती ही नैतिक परीक्षाही असते आणि एआय त्यालाअपवाद नाही. आज आपल्या समोरचा सर्वात मोठाधोका म्हणजे आपण महत्त्वाचा प्रश्नच विसरत आहोत.तो म्हणजे ही बुद्धिमत्ता नेमकी कोणाच्या सेवेसाठीआहे? जागतिक स्तरावरील बहुतांश चर्चा नैतिक एआयव जबाबदार एआय याभोवती केंद्रित आहेत. मात्रअधिक सक्षम प्रशासन, अर्थपूर्ण उत्तरदायित्व आणिप्रभावी नियमन यांचीही गरज आहे. नैतिकता आपल्यालायोग्य-अयोग्याची जाणीव करून देते. कायदे मर्यादाआखू शकतात, पण अब्जावधी लोकांच्या आयुष्यावरपरिणाम करणारे तंत्रज्ञान घडवणाऱ्यांची मानसिकताबदलू शकत नाहीत. त्यासाठी अधिक खोल मूल्याचीआवश्यकता आहे आणि ती म्हणजे करुणा. करुणाम्हणजे केवळ सहानुभूती, दयाळूपणा किंवा परोपकारनव्हे. ती या सर्वांपेक्षा वेगळी आहे. ती केवळ भावनाकिंवा अमूर्त नैतिक आदर्शही नाही. आपण दुसऱ्याचेदुःख स्वतःचे मानतो तेव्हा करुणेची सुरुवात तेव्हा होते.हीच भावना आपल्याला त्या व्यक्तीची वेदना कमीकरण्यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करते. त्यासाठीआवश्यक धैर्यही करुणेतच असते. करुणा आपल्यालाकेवळ व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवण्याकडे नेतनाही, तर मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याची प्रेरणाहीदेते. करुणामूलक एआय इतर चौकटींपेक्षा वेगळे आहे,कारण त्याची सुरुवात तंत्रज्ञानापासून नव्हे, तरमानवतेपासून होते. एखादी प्रणाली काय करू शकते, हाप्रश्न विचारण्यापूर्वी ती कोणासाठी काम करते, हा प्रश्न तेविचारते. अधिक कार्यक्षमतेपूर्वी ते मानवी परिणामांचाविचार करते. नवकल्पनांचा उत्सव साजरा करण्यापूर्वीकोणी मागे तर राहणार नाही ना, याची खात्री करते. आज एआयमधील अनेक त्रुटी—पूर्वग्रह, भेदभाव,बहिष्कार, दिशाभूल करणारी माहिती, पर्यावरणीय हानीआणि बालकल्याणाला निर्माण होणारे धोके—यांनाप्रगतीचे दुर्दैवी दुष्परिणाम म्हणून पाहिले जाते. मात्र त्याकेवळ दुष्परिणाम नाहीत. त्या याचाही पुरावा आहेत की,या प्रणाली विकसित करताना मानवतेच्या हिताचाविचार करणारी व्यक्ती अनुपस्थित होती, तिच्याकडेदुर्लक्ष झाले किंवा तिचे मत ऐकले गेले नाही. सामाजिकमाध्यमांचे दुष्परिणाम आपण आधीच अनुभवले आहेत.त्यामुळे एआय अर्थव्यवस्था कशी बदलेल, हा प्रश्नविचारण्यापेक्षा अल्गोरिदम दुसऱ्याच्या वेदनाजाणण्याची मानवी क्षमता कमी करू लागतील, तेव्हात्याचे परिणाम काय असतील, हा प्रश्न विचारणे अधिकआवश्यक आहे. एआयला वेदना ओळखण्याचेप्रशिक्षणच दिले गेले नसेल, तर तो न्यायाचे रक्षण करूशकेल का? जर त्याचे एकमेव उद्दिष्ट नफा वाढवणेअसेल, तर तो शांततेला प्राधान्य देईल का? हे नैतिकप्रश्न तांत्रिक प्रश्नांपूर्वी विचारले गेले पाहिजेत. कारणमानवतेचे भविष्य घडवण्याची क्षमता त्यांच्यातच आहे. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय विकसकांनी आपल्याप्रयोगशाळांबाहेर पडून खाणी आणिकारखान्यांतील बालकामगारांनाभेटले पाहिजे. विस्थापित कुटुंबांशीसंवाद साधला पाहिजे आणि गरिबी,भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहनकरणाऱ्या वंचित समाजघटकांमध्येकाही काळ घालवला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: हजारो पदे रिक्त, कामगारांवर ताण! प्रलंबित पदोन्नती अन् भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर
- अमरावती: मुलीच्या संसारासाठी सासू सरसावली; स्वतःची किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन;
- पुणे: भोसरीतील गोडाऊन चौक, खाडी मशीन ते वडमुखवाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा
- नागपूर: 'मैत्रिणीकडे आहे, लवकरच घरी येते'; उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे संशयास्पदरीत्या अपहरण
महाराष्ट्र
- सोलापुर: करार संपल्याने ७०० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांचे महिनाभरापासून दुपारचे जेवण बंद
- छत्रपती संभाजीनगर: हजारो पदे रिक्त, कामगारांवर ताण! प्रलंबित पदोन्नती अन् भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर
- बीड: जादूटोण्याची भीती दाखवून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक; त्र्यंबकेश्वरच्या दोन ठगांवर बीडमध्ये गुन्हा दाखल
- अमरावती: मुलीच्या संसारासाठी सासू सरसावली; स्वतःची किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन;
गुन्हा
- कोल्हापुरात खळबळ! २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत गायकवाडला रंगेहात अटक; मोठे रॅकेट उघडकीस
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली


























Subscribe to my channel




