
Pune : पुण्याच्या मावळ तालक्यातील पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये १८ वर्षांचा अद्वैत वर्मा काही दिवसांपूर्वी बुडून मृत्यूमुखी पडला. आता त्याच्या पालकांनी २३ जुलै रोजी राज्य सरकारविरोधात दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ कायद्याच्या कलम ८० नुसार खटला दाखल केला आहे. जेणेकरून इतर कुणाच्या मुलाचा मृत्यू होऊ नये. अद्वैत वर्मा हा मुळचा दिल्लीचा असून विमान नगर येथील सिम्बॉसिस महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. महाविद्यालयातील त्याच्या मित्रांसह तो पवना धरणावर सहलीसाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.
पर्यटनस्थळी सूचना फलक असावेत
अद्वैत वर्माचे काका आणि दिल्लीस्थित असलेले वकील सुरेश वर्मा यांनी सांगितले की, पवना धरणाच्या बॅकवॉटरजवळ पर्यटकांना माहिती देणारे फलक लावलेले गेले नाहीत. तिथं जीवाला धोका आहे, असे कुठेही लिहिलेले नाही. त्यामुळे अशा लोकप्रिय पर्यटनस्थळी मुलांचा मृत्यू झाल्यास, फक्त मुलांना त्यासाठी दोष देणे चुकीचे आहे. २३ जुलै रोजी पुण्यातील स्थानिक वकील नितीन कांबळे यांच्यामार्फत राज्य सरकारला नोटीस पाठविण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि सुरक्षेचे योग्य उपाय न योजिल्याबद्दल सरकारला दोषी धरण्यात आले आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला आणि ही सरकारची जबाबदारी आहे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
|
Pune Fire : पुण्यातील खराडी परिसरात सोफा कारखान्याला भीषण आग, परिसरात पसरले धुराचे लोट |
लोणावळ्याच्या नजीक पवना धरण आहे. इकडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. येथे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात २० वर्षीय मनीष शंकर शर्मा यांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात २५ वर्षीय मयांक अखिलेश उपाध्याय, जूनमध्ये अद्वैत वर्मा आणि जुलैमध्ये सागर कैलास साठे यांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. या सर्वांचाच बुडून मृत्यू झाला.
अद्वैत वर्मा प्रकरणाचे वकील नितीन कांबळे यांनी म्हटले की, आमच्या नोटिशीला उत्तर देताना राज्य सरकार खुल्या जागी सुरक्षारक्षक तैनात करू शकत नाही, असे उत्तर कदाचित देऊ शकते. मात्र सुरक्षारक्षक तैनात नाही केले तरी अशा लोकप्रिय पर्यटन स्थळी जवळच्या पोलीस ठाण्यातून मदत पुरविली गेली पाहिजे. लाईफ जॅकेट, बोट आणि जीवरक्षक अशा परिसरात उपलब्ध केले पाहिजेत, अशी अपेक्षा नितीन कांबळे यांनी व्यक्त केली.
नुकसान भरपाई मागणार
वर्मा कुटुंबीयांनी आता राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मागितली आहे. तसेच या विषयावर जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्वैत वर्माच्या पुण्यातील स्थानिक पालक असलेल्या मोनिका बुदकी यांनी म्हटले की, अद्वैत पवना धरणाजवळ सहलीसाठी जात आहे, हे मला माहीत असते तर मी त्याला तेथील धोक्याची माहिती दिली असती. मोनिका यांनी म्हटले की, अद्वैतच्या मित्रांनी सहलीची माहिती देताना सांगितले की, पाण्याची पातळी अचानक वाढली. कोणतीही आगाऊ सूचना न देता धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अद्वैत बुडाला.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




