
Pune : पुण्याच्या मावळ तालक्यातील पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये १८ वर्षांचा अद्वैत वर्मा काही दिवसांपूर्वी बुडून मृत्यूमुखी पडला. आता त्याच्या पालकांनी २३ जुलै रोजी राज्य सरकारविरोधात दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ कायद्याच्या कलम ८० नुसार खटला दाखल केला आहे. जेणेकरून इतर कुणाच्या मुलाचा मृत्यू होऊ नये. अद्वैत वर्मा हा मुळचा दिल्लीचा असून विमान नगर येथील सिम्बॉसिस महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. महाविद्यालयातील त्याच्या मित्रांसह तो पवना धरणावर सहलीसाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.
पर्यटनस्थळी सूचना फलक असावेत
अद्वैत वर्माचे काका आणि दिल्लीस्थित असलेले वकील सुरेश वर्मा यांनी सांगितले की, पवना धरणाच्या बॅकवॉटरजवळ पर्यटकांना माहिती देणारे फलक लावलेले गेले नाहीत. तिथं जीवाला धोका आहे, असे कुठेही लिहिलेले नाही. त्यामुळे अशा लोकप्रिय पर्यटनस्थळी मुलांचा मृत्यू झाल्यास, फक्त मुलांना त्यासाठी दोष देणे चुकीचे आहे. २३ जुलै रोजी पुण्यातील स्थानिक वकील नितीन कांबळे यांच्यामार्फत राज्य सरकारला नोटीस पाठविण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि सुरक्षेचे योग्य उपाय न योजिल्याबद्दल सरकारला दोषी धरण्यात आले आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला आणि ही सरकारची जबाबदारी आहे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
|
Pune Fire : पुण्यातील खराडी परिसरात सोफा कारखान्याला भीषण आग, परिसरात पसरले धुराचे लोट |
लोणावळ्याच्या नजीक पवना धरण आहे. इकडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. येथे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात २० वर्षीय मनीष शंकर शर्मा यांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात २५ वर्षीय मयांक अखिलेश उपाध्याय, जूनमध्ये अद्वैत वर्मा आणि जुलैमध्ये सागर कैलास साठे यांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. या सर्वांचाच बुडून मृत्यू झाला.
अद्वैत वर्मा प्रकरणाचे वकील नितीन कांबळे यांनी म्हटले की, आमच्या नोटिशीला उत्तर देताना राज्य सरकार खुल्या जागी सुरक्षारक्षक तैनात करू शकत नाही, असे उत्तर कदाचित देऊ शकते. मात्र सुरक्षारक्षक तैनात नाही केले तरी अशा लोकप्रिय पर्यटन स्थळी जवळच्या पोलीस ठाण्यातून मदत पुरविली गेली पाहिजे. लाईफ जॅकेट, बोट आणि जीवरक्षक अशा परिसरात उपलब्ध केले पाहिजेत, अशी अपेक्षा नितीन कांबळे यांनी व्यक्त केली.
नुकसान भरपाई मागणार
वर्मा कुटुंबीयांनी आता राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मागितली आहे. तसेच या विषयावर जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्वैत वर्माच्या पुण्यातील स्थानिक पालक असलेल्या मोनिका बुदकी यांनी म्हटले की, अद्वैत पवना धरणाजवळ सहलीसाठी जात आहे, हे मला माहीत असते तर मी त्याला तेथील धोक्याची माहिती दिली असती. मोनिका यांनी म्हटले की, अद्वैतच्या मित्रांनी सहलीची माहिती देताना सांगितले की, पाण्याची पातळी अचानक वाढली. कोणतीही आगाऊ सूचना न देता धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अद्वैत बुडाला.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.


























Subscribe to my channel



