
250 passenges flying from London to Mumbai stranded in Turkey : लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानामधील २५० हून अधिक प्रवासी तुर्कीच्या दियारबाकिर विमानतळावर अडकून पडले आहेत. ४० तासांपेक्षा जास्त काळापासून अडकलेल्या या प्रवाशांमध्ये बरेचसे भारतीय नागरिक देखील आहेत.
दरम्यान या एरलाइन्सच्या प्रवक्त्याने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, “२ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणाऱ्या VS358 विमानचा तातडीच्या वैद्यकीय कारणामुळे दियारबाकिर विमानतळाकडे मार्ग बदलण्यात आला. तसेच या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड आढळल्याने त्याची तपासणी सुरू आहे.”
प्रवाशांना होत असलेल्या गैरसौयीबद्दलही विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. “आमच्या ग्राहकांचे आणि कर्मचार्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून क्षमा मागतो. आवश्यक असलेल्या तांत्रिक परवानगी मिळाल्यानंतर आम्ही शुक्रवार ४ एप्रिल रोजी स्थानिक वेळ १२.०० वाजता दियारबाकिर विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान VS358 पुन्हा प्रवास सुरू करेल,” असे व्हर्जिन अटलांटिकच्या प्रवक्त्याने सांगितले.
|
|
“जर मंजूरी मिळाली नाही तर, आम्ही उद्या दुपारी आमच्या प्रवाशांना तुर्कीतील दुसऱ्या विमानतळावरील पर्यायी विमानात बसने ट्रान्सफर करण्याची योजना आखत आहोत, जेणेकरून आमच्या ग्राहकांचा मुंबईपर्यंतचा प्रवास पूर्ण होईल,” असेही विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यानच्या काळात प्रवाशांना तुर्कीमध्ये रात्री हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे, तर आम्ही या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे व्हर्जिन अटलांटिकने म्हटले आहे.
दरम्यान तुर्कीमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. विमानतळावर वाट पाहत असलेल्या ३०० प्रवाशांसाठी एकच शौचालय असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तर एका प्रवाशाने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, तापमान घसरलेले असताना देखील प्रवाशांना ब्लँकेट देण्यात आले नव्हते.
दरम्यान विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये प्रवासी विमातळावरील बाकड्यावर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अंकारा येथील भारतीय दूतावासाने या घटनेवर लक्ष देऊन असल्याचे सांगतले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




