
250 passenges flying from London to Mumbai stranded in Turkey : लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानामधील २५० हून अधिक प्रवासी तुर्कीच्या दियारबाकिर विमानतळावर अडकून पडले आहेत. ४० तासांपेक्षा जास्त काळापासून अडकलेल्या या प्रवाशांमध्ये बरेचसे भारतीय नागरिक देखील आहेत.
दरम्यान या एरलाइन्सच्या प्रवक्त्याने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, “२ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणाऱ्या VS358 विमानचा तातडीच्या वैद्यकीय कारणामुळे दियारबाकिर विमानतळाकडे मार्ग बदलण्यात आला. तसेच या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड आढळल्याने त्याची तपासणी सुरू आहे.”
प्रवाशांना होत असलेल्या गैरसौयीबद्दलही विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. “आमच्या ग्राहकांचे आणि कर्मचार्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून क्षमा मागतो. आवश्यक असलेल्या तांत्रिक परवानगी मिळाल्यानंतर आम्ही शुक्रवार ४ एप्रिल रोजी स्थानिक वेळ १२.०० वाजता दियारबाकिर विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान VS358 पुन्हा प्रवास सुरू करेल,” असे व्हर्जिन अटलांटिकच्या प्रवक्त्याने सांगितले.
|
|
“जर मंजूरी मिळाली नाही तर, आम्ही उद्या दुपारी आमच्या प्रवाशांना तुर्कीतील दुसऱ्या विमानतळावरील पर्यायी विमानात बसने ट्रान्सफर करण्याची योजना आखत आहोत, जेणेकरून आमच्या ग्राहकांचा मुंबईपर्यंतचा प्रवास पूर्ण होईल,” असेही विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यानच्या काळात प्रवाशांना तुर्कीमध्ये रात्री हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे, तर आम्ही या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे व्हर्जिन अटलांटिकने म्हटले आहे.
दरम्यान तुर्कीमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. विमानतळावर वाट पाहत असलेल्या ३०० प्रवाशांसाठी एकच शौचालय असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तर एका प्रवाशाने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, तापमान घसरलेले असताना देखील प्रवाशांना ब्लँकेट देण्यात आले नव्हते.
दरम्यान विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये प्रवासी विमातळावरील बाकड्यावर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अंकारा येथील भारतीय दूतावासाने या घटनेवर लक्ष देऊन असल्याचे सांगतले आहे.
शहर
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


