मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक (मॅनेजर) दिशा सालियन हिच्या गूढ मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "दिशा सालियनच्या मृत्यूबाबत तिच्या वडिलांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता, असे असतानाही पोलिसांनी एफआयआर (गुन्हा) का नोंदवला नाही? प्रकरणाची नोंद केवळ 'अपघाती मृत्यू' (ADR) अशी का करण्यात आली? आणि कोणत्या बाबींमुळे पोलिसांना या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करण्यापासून रोखण्यात आले?" असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीदरम्यान विचारला.
न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या हायप्रोफाइल प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपासातील त्रुटींवर बोट ठेवत पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
घटना आणि न्यायालयाचे निरीक्षण
दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुरुवातीला 'अपघाती मृत्यू' अशी नोंद करून चौकशी केली होती आणि अखेरीस तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेत एक याचिका दाखल केली. आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. तसेच, या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI) कडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी विनंती त्यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी राजतर्फे बाजू मांडताना सांगितले की, "या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू अशी करण्यात आली होती आणि पोलिसांनी दोनदा सखोल चौकशी केली. दोन्ही वेळा चौकशीत तिने जीव दिल्याचेच निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांवरूनही या निष्कर्षाला दुजोरा मिळाला आहे."
तथापि, सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने शवविच्छेदन (Post-mortem) अहवालावरून अत्यंत महत्त्वाचा आणि तांत्रिक प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने विचारले की, "जर एखादी व्यक्ती १४ मजल्यांच्या प्रचंड उंचीवरून खाली पडली, तर तिच्या शरीरावर कोणतीही मोठी दुखापत होणार नाही का? शवविच्छेदन अहवालानुसार इतक्या उंचावरून पडूनही शरीरावर दुखापती कशा आढळल्या नाहीत?"
यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी सांगितले की, उपलब्ध छायाचित्रांनुसार संबंधित व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाल्याचे दिसून आले होते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांनी आक्षेप घेत पोलिसांच्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये अशा प्रकारच्या दुखापती नसल्याचा दावा केला आणि नंतर ते फोटो बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.
तसेच, उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरत विचारले की, जेव्हा पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणात कोणताही एफआयआर नोंदवला गेला नाही आणि केवळ अपघाती मृत्यूची चौकशी सुरू आहे, तेव्हा अपघाती मृत्यू अहवाल (ADR) यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे याचिकाकर्त्या वडिलांना देण्यापासून पोलिसांनी का रोखले? कागदपत्रे लपवण्यामागे नेमके कारण काय, असा सवालही न्यायालयाने केला.
या महत्त्वपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी आगामी २४ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित करण्यात आली असून, त्यापूर्वी सर्व बाजूंच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



