या रविवारी जरा विचार करा. आईने तिच्या मैत्रिणीसोबत तुमचे आवडते लोणचे पाठवण्याचे किती वेळा सुचवले असेल? तुम्ही दिलेले उत्तरही तुम्हाला आठवत असेल. आई, कुरिअरच्या खर्चापेक्षा येथे स्वस्त दरात मला लोणचे विकत मिळते, असे तुम्ही आईला सांगितले असावे. शिवाय तुझ्या मैत्रिणीला माझ्या ऑफिसमध्ये पाठवू नकोस. त्या तिथे आल्यावर सर्व गोष्टींचे निरीक्षण करतात. असे बोलल्यानंतर तुम्ही त्या वेळी आईचा चेहरा पाहिला असता तर तिच्या चेहऱ्यावरील आनंद कमी झालेला तुम्हाला दिसला असता. फोन ठेवल्यानंतरही आई उदास असते. हळूच ‘खूप बदलला आहे,’ असे म्हणत देवाकडे तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते. लोणच्याची बरणी बाजूला ठेवून ती एखादा चमत्कार होऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा करते. वडील विचारतात की, ‘त्याने पुन्हा नकार दिला का? मुंबईत सर्वकाही मिळते.’ तेव्हा पदराने तोंड पुसताना आई तेथील भेसळयुक्त तेल आणि औषधांविषयी बोलते. पण ती पदराने आपले डोळेही पुसत होती, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. तुमच्या एका नकाराची किंमत काय आहे, याची तुम्हाला कल्पना नाही. तिच्या या भावनेला नकार देऊन तुम्ही अन्न नाकारत नाही, तर तिचे महत्त्वही नाकारता. तिला वाटते की आता तिची गरज नाही. तिच्यासाठी भावनांमधील हे अंतर मैलांच्या अंतरापेक्षा मोठे असते. तिला ती दोन दशके आठवतात. तेव्हा तुम्ही तिच्याशिवाय जेवत नव्हता. तो लहान मुलगा आईकडे अन्नासाठी हट्ट करायचा. पण आजचा मनुष्य म्हणतो की ‘मी सांभाळून घेईन.’ ती लोणचे तुमच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणिवेसाठी पाठवत असते. तुमचा प्रत्येक ‘मॅनेज करेन’ हा शब्द तिची ही भावना कमी करतो. हा प्रश्न सेंद्रिय लिंबाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील तिच्या भूमिकेचा आहे. आई तिच्या मैत्रिणीला पाठवणार असते. ती आईसाठी महाभारतातील ‘संजय’ असते. तीच मैत्रिणी आईला तुमच्याबद्दलच्या सर्व गोष्टी अचूकपणे सांगणार असते. कदाचित आई तिला ‘तिथे मुलासाठी एखादी चांगली मुलगी दिसली का?’ असेही विचारू शकते. मला ही गोष्ट खूप उशिरा समजली. त्यामुळे तुम्ही चूक करू नका. छोटी मदत स्वीकारणे हे तुमच्या गरजांशी संबंधित नसून तुमच्या प्रिय व्यक्तींना त्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आहे. आई तुमच्या ऑफिसचा किंवा वैयक्तिक आयुष्यातील ताण कमी करू शकत नाही. पण तिने पाठवलेले पदार्थ तुम्हाला थोडा दिलासा देतील हे तिला माहीत असते. त्यामुळे तिला हे करू द्या. माझी आई राहिली नाही, तेव्हा मला ते लोणच्यासाठी येणारे फोन आणि त्याची चव खूप आठवायची. ती एक अशी व्यक्ती होती. तिला फक्त देणे माहीत होते. तिने पापड किंवा लोणचे दिले पण कधी स्वतःसाठी साधी साडीही मागितली नाही. ही चूक मी वडिलांच्या बाबतीत केली नाही. मला पगार चांगला असूनही ते मला ‘कामी येतील’ असे म्हणून हातात पैसे द्यायचे. मीही त्यांना कधी नकार दिला नाही, जेणेकरून माझ्या खर्चात आजही त्यांची भूमिका आहे असे त्यांना वाटावे. 2008 मध्ये मी नाशिकमध्ये घर घेणार होतो. तेव्हा त्यांनी त्यांचे खाते रिकामे करून मला 71 हजार रुपये दिले. ती रक्कम कदाचित कमी असेल. पण माझ्यासाठी ती ‘अक्षयपात्र’ ठरली. मला घर घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागले नाही. आजही आम्ही ते घर विकण्याचा विचार करतो तेव्हा त्यांचे प्रेम आणि वडील म्हणून त्यांची भूमिका आम्हाला अडवते. जणू काही ते आजही आसपासच आहेत असे वाटते. ही गोष्ट बेंजामिन फ्रँकलिन यांच्या 1785 ते 1788 या काळातील पेनसिल्व्हेनिया विधानसभेच्या कार्यकाळाची आठवण करून देते. एका कट्टर विरोधकाचे मन जिंकण्यासाठी त्यांनी स्वतः कोणतीही मदत केली नाही. त्याऐवजी त्यांनी त्या विरोधकाकडून एक दुर्मिळ पुस्तक मागितले. तो विरोधक तयार झाला आणि दोघे आयुष्यभराचे मित्र बनले. हेच मानवी मानसशास्त्र आहे. लोक तुमच्यासाठी काही करतात, तेव्हा तुम्हाला ते आवडतात अशी धारणा ते करत असतात.
फंडा असा की- केवळ उपकार म्हणून नाही, तर नात्यातील प्रेम आणि काळजी टिकवून ठेवण्यासाठी आप्तांची मदत स्वीकारली पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/KNZmQ