
Uttarkashi Cloudburst : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली. यामुळे अनेक गावं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या ढगफुटीमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी पळण्याची देखील संधी मिळाली नाही. अनेक घरं, हॉटेल, इमारती अक्षरश: वाहून गेल्या. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या ढगफुटीनंतर उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आले आहेत. अनेकांचा संपर्क होत नाहीये. महाराष्ट्रातून देखील अनेक पर्यटक उत्तराखंडमध्ये गेले होते. पुणे जिल्ह्यातले १९ जण आणि सोलापूरमधील ४ तरुण उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. हे सर्वजण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांशी संपर्क होत नसल्यामुळे त्यांचे नातेवाईक चिंतेत आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेले १९ जण हे आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमधील आहेत. या गावातील १९९० सालच्या दहावीच्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक ग्रुप पर्यटनासाठी १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आता यातील एकाशी देखील संपर्क होत नाहीये.
काल सकाळी या ग्रुपमधील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. विशेष म्हणजे हा सर्व ग्रुप त्याच भागातच असल्याचे सांगितले जात आहे. काल ग्रुपमधील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून 'आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.', असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत त्यांच्यापैकी कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या सर्वाचा शोध घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा करत आहेत. कोणाशीही संपर्क होत नसल्यामुळे या ग्रुपमधील सर्वच सदस्यांची कुटुंबीय चिंतेत आले आहेत. त्यांची मुलं रडून रडून बेहाल झालेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या सर्व पर्यटकांचा कुटुंबीयांशी संपर्क करून द्यावा यासाठी प्रशासनाला आवाहन केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बेपत्ता झालेल्यांची नावं आणि संपर्क क्रमांकही टाकला आहे.
दरम्यान, सोलापुरातील चार तरुण उत्तारखंडमध्ये गेले होते. काल सकाळी ११ वाजता या तरुणांचा कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे सुखरूप असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर त्यांच्याशी काहीच संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले आहेत. सध्या सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघांची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय.
तर, नांदेडमधील देखील काही जण उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते हे सर्वजण सुखरूप आहेत. नांदेड येथील वेगवेगळ्या ठिकाणी ११ पर्यटक गेले होते. उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर हे सर्वजण एकत्र आले आहेत. नांदेडमधील सर्व पर्यटक यमुनोत्री येथे सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन पर्यटकांशी सातत्याने संपर्क करत आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



