T20 WC : अभिषेक शर्मा फिट व्हावा यासाठी पाकिस्तानची प्रार्थना! सलमान आगाने सांगितलं कारण... Image Credit source: Asian Cricket Council
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला आणि दुसऱ्या सामन्यात नामिबियाला पराभूत केलं. आता भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे. असं असताना अभिषेक शर्मा या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. मागच्या सामन्यापूर्वी त्याला पोटात गडबड झाल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज मिळाला पण नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. त्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढच्या दोन तीन सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिट अँड फाईन व्हावा अशी इच्छा भारतीय क्रीडाप्रेमींची आहे. आता अशीच इच्छा पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने व्यक्त केली आहे. त्याने सांगितलं की, भारताने आपली सर्वश्रेष्ठ प्लेइंग मैदानात उतरवावी, यात अभिषेक शर्माही असावा.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने सांगितलं की, आशा आहे की उद्या अभिषेक शर्मा खेळेल. त्याची तब्येत सुधारत आहे. आम्ही सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध खेळू इच्छित आहोत. आमची अभिषेक शर्मा खेळावा अशीच इच्छा आहे. मग पाकिस्तानसमोर आव्हान वाढलं तरी काही हरकत नाही. अभिषेक शर्मा जगातील सर्वात घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या रडारमध्ये गोलंदाज आला तर त्याची काही खैर नसते. अभिषेककडे पावरप्लेमध्ये सामना संपण्याची ताकद आहे. आशिया कप स्पर्धेत याची अनुभूती पाकिस्तान संघाला आली आहे.
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध 31, 74 आणि 5 धावांची खेळी केली होती. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पण आता अभिषेक शर्माचं खेळणं कठीण आहे. कारण 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला 103 ताप होता. त्यात पोटात गडबडही झाली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याचं वजनही कमी झालं असून नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही.
पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून कोलंबोत आहे. त्यामुळे त्यांनी या वातावरणाशी बऱ्यापैकी जुळवून घेतलं आहे. त्यात दोन सामन्यात विजयही मिळवला आहे. त्यामुळे भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान सोपं नसेल. त्यात फिरकीची भक्कम फळी पाकिस्तानकडे आहे. भारताला आणखी ताकदीने या सामन्यात उतरावं लागणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




