
Raigad : राज्यभर तिथीनुसार (6 मार्च) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. मात्र शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजांच्या समाधी परिसरात सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लाकडी बॅरिकेट तुटलेले असून ते दुरुस्त करण्याऐवजी चक्क कापडी चिंध्यांनी बांधून ठेवण्यात आल्याचे उघड झाल्याने शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
समाधी परिसरातील बॅरिकेटची दुरवस्था
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने लाकडी बॅरिकेट उभारण्यात आले आहेत. मात्र यापैकी काही बॅरिकेट तुटले असून त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तुटलेल्या भागाला तात्पुरत्या स्वरूपात कापडी चिंध्यांनी बांधण्यात आल्याचे चित्र शिवजयंतीच्या दिवशीच समोर आले. त्यामुळे शिवभक्तांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवजयंतीला भाविकांची मोठी गर्दी
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त हजारो भाविक, शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर दाखल झाले होते. अशा वेळी महाराजांच्या समाधीस्थळाजवळील बॅरिकेटची ही अवस्था पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत प्रशासनावर टीका केली. शिवरायांच्या राजधानीतच असा निष्काळजीपणाचा प्रकार घडत असल्याने राज्यकर्ते आणि संबंधित यंत्रणा ऐतिहासिक वारशाबाबत किती गंभीर आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विकासकामांवरून यापूर्वीही टीका
किल्ले रायगडावरील विकासकामांबाबत यापूर्वीही अनेकदा निकृष्ट दर्जा आणि नियोजनाच्या अभावाबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. पुरातत्त्व विभाग आणि रायगड प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे आरोपही झाले होते. अशा पार्श्वभूमीवर समाधी परिसरातील बॅरिकेट तुटलेले असताना ते चिंध्यांनी बांधण्याचा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
नेमकी जबाबदारी कुणाची?
हे बॅरिकेट नेमके पुरातत्त्व विभागाने की रायगड प्राधिकरणाने अशा पद्धतीने दुरुस्त केले, याबाबत मात्र अधिकृतरीत्या कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. मात्र शिवजयंतीच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे रायगडावर आलेल्या शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
वारशाच्या जतनाबाबत प्रश्नचिन्ह
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत पवित्र स्थळ असलेल्या रायगड किल्ल्यावर अशा प्रकारची परिस्थिती दिसून येत असल्याने ऐतिहासिक वारशाच्या जतनाबाबत प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel




Promote our products—get paid for every sale you generate!