
New Delhi : जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू विभागाला दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात लक्ष्य केल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. जम्मू विभागातील १०पैकी आठ जिल्ह्यांना दहशतवादाची झळ बसली असून त्यामध्ये एकूण ४४ जण ठार झाले आहेत. वर्षभरात एकूण १८ सैनिक शहीद झाले आणि १३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत.
यापूर्वी तीन वर्षांच्या कालावधीत राजौरी आणि पूंछ या नियंत्रणरेषेलगतच्या जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले आणि नागरिकांवर हल्ले करून बरीच प्राणहानी घडवली. सुरक्षा दलांनी केलेल्या उपाययोजनांमुळे २०२४मध्ये या दोन जिल्ह्यांमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाल्यानंतर, म्हणजे एप्रिल-मेपासून जम्मू विभागाच्या रियासी, दोडा, किश्तवार, कथुआ, उधमपूर आणि जम्मू या जिल्ह्यांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सूत्रधारांचा जम्मू-काश्मीरच्या शांततापूर्ण भागांमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न असफल करण्यासाठी पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांबरोबरच्या (सीएपीएफ) समन्वयाने लष्कर मोहिमा आखत आहे. विशेषत: दाट जंगलांसारख्या असुरक्षित भागांमध्ये सुरक्षा दलांनी मोहिमा राबवल्या.
|
Baku : युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ |
अधिकृत आकडेवारीनुसार दोडा, कथुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये या वर्षी प्रत्येकी नऊ जणांचा दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला. त्यापाठोपाठ किश्तवारमध्ये पाच, उधमपूरमध्ये चार, जम्मू व राजौरीमध्ये प्रत्येकी तीन आणि पूंछमध्ये प्रत्येकी दोन अशी प्राणहानी झाली. यामध्ये १८ सुरक्षा सैनिक शहीद झाले, १३ दहशतवादी ठार झाले आणि १४ नागरिक मरण पावले. त्यामध्ये सात यात्रेकरू आणि तीन ग्राम संरक्षकांचा समावेश आहे.
दशकभरापूर्वी काश्मीरमध्ये अशांतता असताना जम्मू विभाग मात्र तुलनेने शांत होता. मात्र, ऑक्टोबर २०२१पासून राजौरी आणि पूंछ भागात दहशतवाद्यांनी अधिक करून लष्करी वाहनांना लक्ष्य केले आहे. त्यामध्ये ४७ सैनिक शहीद झाले.
दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू
किश्तवारमध्ये गुरुवारी दोन ग्राम संरक्षकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सोमवारीही सुरू होता. सुरक्षा दलांनी आखलेल्या शोधमोहिमेदरम्यान, किश्तवारमधील केशवान जंगलामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत रविवारी नायब सुभेदार राकेश कुमार शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले. केशवान आणि कुंटवारा जंगलासह अवतीभोवतीच्या परिसरात दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून गेल्या चार दिवसांपासून ही शोधमोहीम राबवली जात आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



