
Pune : वाहतूक बेशिस्तीप्रकरणी बजावण्यात आलेल्या दंडाचा भरणा येत्या ३० दिवसांत न केल्यास अशा वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून ही विशेष मोहीम आयोजिण्यात आली असून, रस्त्यावर कारवाईसाठी पोलिस कर्मचारी नेमले जाणार आहेत.
शहरात मार्च २०१९पासून ई-चलनाद्वारे वाहतूक बेशिस्तीचा दंड पाठविण्याची प्रणाली सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे बेशिस्ती टिपून कारवाईचे प्रमाण वाढवले होते. मात्र, ई-चलन मिळाल्यावर लाखो वाहनचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आजतागायत दिसले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे, प्रलंबित दंडाची पारदर्शक पद्धतीने वसुली करणे आणि शहरातील वाहतूक शिस्त अधिक सक्षम करणे, यासाठी वाहतूक पोलिसांनी ही मोहीम आखली आहे.
वाहतूक नियमभंगाबाबत ई-चलन प्रलंबित असलेल्या वाहनाच्या मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस पाठविली जाणार आहे. संबंधित वाहनमालकांनी नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई
संबंधित वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याबाबत प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडे पाठविण्यात येईल.
संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्यात येईल.
नोटीस कशी पाठविली जाईल?
ही नोटीस वाहनमालकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येईल.
ही नोटीस २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ आणि एक मार्च २०२६ या कालावधीतच पाठविण्यात येणार आहे. या कालावधीव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने येणारा कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.
दंड कसा भरायचा?
अधिकृत वेबसाइटवरून https://mahatraf-ficechallan.gov.in दंड भरणे शक्य.
Pune Traffic Police App (PTP App) या अॅपवरून दंड भरता येतो
जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात ई-चलान मशिनवर क्यूआर कोड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरावा.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी.
वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाइल पाठविण्यात येणार नाही.
वाहनचालकांनी ओटीपी कोणालाही शेअर करू नये.
केवळ नोटिशीत नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा.
संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेश आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



