
Pune : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सतत होणार वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एका नव्या मार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक्सप्रेसवेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर सवाल केला गेला होतो त्यावेळी अनेक महिने कागदावरच असलेल्या उरण-कर्जत-शिरूर महमार्गासाठी सरकारने हलाचाली सुरू केल्या आहे.
तासान् तास वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या महिन्यात तब्बल 32 तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय प्रत्येक वीकेंड किंवा सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावर कोंडी होणे हे नागरिकांना अपेक्षितच असते. यासाठी पर्याय म्हणून उरण-कर्जत महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर 2025मध्येच एका बैठकीत मंत्रिमंडळासमोर यासाठी प्रस्ताव मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही हे काम कधी प्रत्यक्षात सुरूच झालं नाही.
दरम्यान, एक्स्प्रेस वेवर अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे सलग दोन दिवस प्रचंड वाहतूक कोंडी झाली तेव्हा हजारो प्रवासी, नोकरदार, मालवाहू वाहनचालक यांना तासन् तास अडकून पडले होते. अशा परिस्थितीत एकाच मार्गावर अवलंबून असलेली पुणे–मुंबई वाहतूक व्यवस्था किती असुरक्षित आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, सुमारे 135 किलोमीटर लांबीचा चारपदरी शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत– उरण मल्टिनोडल कॉरिडॉर महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. सुमारे बारा ते साडेबारा कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा भार कमी करू शकतो.
कसा असेल मार्ग?
हा कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यास पुणे–पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतुकीवरील ताण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. या मार्गामुळे शिरूर, चाकण, तळेगाव, कर्जत मार्गे थेट उरण (जेएनपीटी) कनेक्टिव्हिटी मिळणार असून, औद्योगिक आणि मालवाहतूक सुलभ होणार आहे. चाकण आणि शिरूर एमआयडीसीतील मालवाहू वाहनांना थेट बंदराशी जोड मिळाल्याने नगर रस्ता आणि एक्स्प्रेस वेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
प्रत्यक्षात हा प्रकल्प अद्याप निर्णय, मंजुरी आणि अंमलबजावणीच्या प्रारंभिक टप्प्यातच अडकलेला आहे. वारंवार वाहतूक कोंडीचा फटका बसत असताना आणि पर्यायी मार्गाची गरज तीव्रतेने जाणवत असताना, हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासन कधी हालचाल करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एक्स्प्रेस वेवरील कोंडी ही तात्पुरती समस्या नसून, ती भविष्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पर्यायी मार्गांचे नियोजन आणि अंमलबजावणी ही काळाची गरज ठरत असताना शिरूर–कर्जत–उरण कॉरिडॉरवर आता तरी ठोस निर्णय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



