दिल्लीतील कुप्रसिद्ध मद्य घोटाळा खटला रद्द करणे हे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासाठी एका महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. पंजाब, गोवा आणि गुजरातमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. आपचा तिन्ही राज्यांमध्ये विशेषतः पंजाबमध्ये राजकीय प्रभाव आहे. तेथे त्यांना त्यांचे सरकार वाचवायचे आहे. त्यादृष्टीने न्यायालयाचा हा निर्णय पक्षासाठी मनोबल वाढवणारा आहे. यातून त्यांच्या कार्यकर्त्यांत नवीन ऊर्जा निर्माण होईल. पक्ष तिन्ही राज्यांत आक्रमक निवडणूक लढण्याची तयारी करेल, अशा दाव्याने मनोबल वाढेल. याचा थेट परिणाम काँग्रेसवर होईल. काँग्रेसला आधीच त्यांच्या कमी होत चाललेल्या जनाधारावरून चिंतेत आहे. पंजाब आणि गोव्यात त्यांना पुनरागमनाची आशा होती. गुजरातमध्ये भाजपला कठीण टक्कर देण्यासाठी ते रणनीती आखत होते. या घडामोडींबद्दल काँग्रेसची प्रतिक्रिया स्पष्टपणे अस्वस्थ करणारी होती. निवडणुकीपूर्वी ‘आप’ नेत्यांना दिलेला दिलासा हा केवळ योगायोग असू शकत नाही असे सांगून पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजपवर काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. त्यांचा सिद्धांत अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतो. परंतु वास्तव असे आहे की ‘आप’ पुन्हा उदयास आला तर ते काँग्रेसला थेट नुकसान पोहोचवू शकते आणि अप्रत्यक्षपणे भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. पंजाबमध्ये काँग्रेस या आशेवर आहे की ‘आप’ सत्ताविरोधी लाट आणि अंतर्गत संघर्ष त्यांना नैसर्गिक फायदा मिळेल. भाजप सध्या राज्यात एक सामान्य खेळाडू आहे. भाजप आपल्या एनडीएतील मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाशी एक मजबूत युती करत नाही तोपर्यंत पुढील निवडणुकीत त्यांना मिळणारे फायदेही मर्यादित राहू शकतात. विधानसभेचे निकाल त्रिशंकू आल्यास भाजपला किंगमेकरची भूमिका बजावण्याची आशा असेल. हीच रणनीती आहे. यातून त्यांना ईशान्येकडील अनेक राज्यांत यश मिळाले आहे. ते आता प्रादेशिक पक्षांसोबत युती करून कनिष्ठ भागीदार म्हणून सत्ता धारण करत आहेत. गोवा आणि गुजरातमध्येही गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसच्या खर्चावर प्रवेश केला. यातून दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सहज विजय मिळवता आला. ऐतिहासिकदृष्ट्या तिरंगी लढत नेहमीच भाजपला फायद्याची ठरली. कारण यातून विरोधी मतांचे विभाजन होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे केजरीवाल यांना नवजीवन मिळाले आहे असे दिसते. चार वर्षांच्या भ्रष्टाचार घोटाळ्यांनंतर आणि कायदेशीर लढाईनंतर राजकीय पुनरागमनासाठी मैदान तयार करण्यासाठी ते या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत. पण या निर्णयामुळे सीबीआयच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय विरोधकांविरुद्ध तपास यंत्रणांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे का याबद्दल वाद पुन्हा सुरू झाला आहे. आरोप फेटाळताना न्यायालयाची भाषा अत्यंत कठोर होती. सीबीआयला फटकारताना न्यायालयाने म्हटले की सादर केलेल्या पुराव्यांमुळे प्रथमदर्शनी खटलाही सिद्ध झाला नाही. गंभीर संशय तर दूरच. शिवाय न्यायालयाने अशी टिप्पणी केली की उत्पादन शुल्क धोरण प्रकरण न्यायालयीन तपासणीच्या कसोटीवर उतरले नाही आणि ते पूर्णपणे अविश्वसनीय असल्याचे सिद्ध झाले.आरोपपत्र तयार करणाऱ्या सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याविरुद्धही न्यायालयाने विभागीय कारवाईची शिफारस केली. एका कमकुवत खटल्यामुळे केजरीवाल 150 दिवस आणि सिसोदिया 530 दिवस तुरुंगात राहिले. या काळात भाजप व काँग्रेसने त्यांच्या विश्वासार्हतेवर हल्ला केला.
अखेर आपने दिल्लीत सत्ता गमावली व तेव्हापासून ते राजकीय दबावाखाली होते. या खटल्यात चार वर्षे गेली. आप नेत्यांकडे विरोधासाठी ठोस यंत्रणा नाही. त्यांना सीबीआयविरुद्ध मानहानी, मानसिक छळाचा खटला दाखल करण्याची परवानगी मिळावी. ते न्यायोचित ठरेल. त्यातही कोर्टाने तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले. परंतु सीबीआय आता फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार करत आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
सीबीआयच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्हकाँग्रेस आधीच आपल्या घटत्या जनाधाराबद्दल चिंतेत आहे. पंजाब, गोव्यात पुनरागमनाची त्यांना आशा होती. गुजरातमध्ये भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी ते रणनीती आखत होते. पण आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



