दिल्लीतील कुप्रसिद्ध मद्य घोटाळा खटला रद्द करणे हे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासाठी एका महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. पंजाब, गोवा आणि गुजरातमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. आपचा तिन्ही राज्यांमध्ये विशेषतः पंजाबमध्ये राजकीय प्रभाव आहे. तेथे त्यांना त्यांचे सरकार वाचवायचे आहे. त्यादृष्टीने न्यायालयाचा हा निर्णय पक्षासाठी मनोबल वाढवणारा आहे. यातून त्यांच्या कार्यकर्त्यांत नवीन ऊर्जा निर्माण होईल. पक्ष तिन्ही राज्यांत आक्रमक निवडणूक लढण्याची तयारी करेल, अशा दाव्याने मनोबल वाढेल. याचा थेट परिणाम काँग्रेसवर होईल. काँग्रेसला आधीच त्यांच्या कमी होत चाललेल्या जनाधारावरून चिंतेत आहे. पंजाब आणि गोव्यात त्यांना पुनरागमनाची आशा होती. गुजरातमध्ये भाजपला कठीण टक्कर देण्यासाठी ते रणनीती आखत होते. या घडामोडींबद्दल काँग्रेसची प्रतिक्रिया स्पष्टपणे अस्वस्थ करणारी होती. निवडणुकीपूर्वी ‘आप’ नेत्यांना दिलेला दिलासा हा केवळ योगायोग असू शकत नाही असे सांगून पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजपवर काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. त्यांचा सिद्धांत अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतो. परंतु वास्तव असे आहे की ‘आप’ पुन्हा उदयास आला तर ते काँग्रेसला थेट नुकसान पोहोचवू शकते आणि अप्रत्यक्षपणे भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. पंजाबमध्ये काँग्रेस या आशेवर आहे की ‘आप’ सत्ताविरोधी लाट आणि अंतर्गत संघर्ष त्यांना नैसर्गिक फायदा मिळेल. भाजप सध्या राज्यात एक सामान्य खेळाडू आहे. भाजप आपल्या एनडीएतील मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाशी एक मजबूत युती करत नाही तोपर्यंत पुढील निवडणुकीत त्यांना मिळणारे फायदेही मर्यादित राहू शकतात. विधानसभेचे निकाल त्रिशंकू आल्यास भाजपला किंगमेकरची भूमिका बजावण्याची आशा असेल. हीच रणनीती आहे. यातून त्यांना ईशान्येकडील अनेक राज्यांत यश मिळाले आहे. ते आता प्रादेशिक पक्षांसोबत युती करून कनिष्ठ भागीदार म्हणून सत्ता धारण करत आहेत. गोवा आणि गुजरातमध्येही गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसच्या खर्चावर प्रवेश केला. यातून दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सहज विजय मिळवता आला. ऐतिहासिकदृष्ट्या तिरंगी लढत नेहमीच भाजपला फायद्याची ठरली. कारण यातून विरोधी मतांचे विभाजन होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे केजरीवाल यांना नवजीवन मिळाले आहे असे दिसते. चार वर्षांच्या भ्रष्टाचार घोटाळ्यांनंतर आणि कायदेशीर लढाईनंतर राजकीय पुनरागमनासाठी मैदान तयार करण्यासाठी ते या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत. पण या निर्णयामुळे सीबीआयच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय विरोधकांविरुद्ध तपास यंत्रणांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे का याबद्दल वाद पुन्हा सुरू झाला आहे. आरोप फेटाळताना न्यायालयाची भाषा अत्यंत कठोर होती. सीबीआयला फटकारताना न्यायालयाने म्हटले की सादर केलेल्या पुराव्यांमुळे प्रथमदर्शनी खटलाही सिद्ध झाला नाही. गंभीर संशय तर दूरच. शिवाय न्यायालयाने अशी टिप्पणी केली की उत्पादन शुल्क धोरण प्रकरण न्यायालयीन तपासणीच्या कसोटीवर उतरले नाही आणि ते पूर्णपणे अविश्वसनीय असल्याचे सिद्ध झाले.आरोपपत्र तयार करणाऱ्या सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याविरुद्धही न्यायालयाने विभागीय कारवाईची शिफारस केली. एका कमकुवत खटल्यामुळे केजरीवाल 150 दिवस आणि सिसोदिया 530 दिवस तुरुंगात राहिले. या काळात भाजप व काँग्रेसने त्यांच्या विश्वासार्हतेवर हल्ला केला.
अखेर आपने दिल्लीत सत्ता गमावली व तेव्हापासून ते राजकीय दबावाखाली होते. या खटल्यात चार वर्षे गेली. आप नेत्यांकडे विरोधासाठी ठोस यंत्रणा नाही. त्यांना सीबीआयविरुद्ध मानहानी, मानसिक छळाचा खटला दाखल करण्याची परवानगी मिळावी. ते न्यायोचित ठरेल. त्यातही कोर्टाने तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले. परंतु सीबीआय आता फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार करत आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
सीबीआयच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्हकाँग्रेस आधीच आपल्या घटत्या जनाधाराबद्दल चिंतेत आहे. पंजाब, गोव्यात पुनरागमनाची त्यांना आशा होती. गुजरातमध्ये भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी ते रणनीती आखत होते. पण आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




