नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा

नवी मुंबई:  महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिला सोनम डोंगरे आणि तिच्या गर्भातील बाळाच्या झालेल्‍या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने संबंधित डॉक्टरांना क्लीनचिट दिली असून, उपचारात कोणतीही हलगर्जीपणा झाला नसल्याचा दावा केला आहे. मात्र, या अहवालामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप उसळला आहे.

नेमकी घटना आणि आरोप काय होते? प्रसूतीसाठी आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सोनम डोंगरे यांना ऐरोली येथील मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान उपचारादरम्यान त्यांना एक इंजेक्शन देण्यात आले, ज्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावल्याचा गंभीर आरोप पती करण डोंगरे व अन्य नातेवाईकांनी केला होता. डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचारामुळे (रॉन्ग इंजेक्शन/डोस) आणि हलगर्जीपणामुळे सोनम व तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्यावरही रुग्णालयाने सुरुवातीला ३ तास कोणतीही योग्य माहिती दिली नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली, असा संतापही पतीने व्यक्त केला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांना वाशी येथील मनपा रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले, जिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ऐरोली रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

 

चौकशी समितीचा अहवाल आणि कारण या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी प्रशासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार, सोनम डोंगरे यांना उपचारादरम्यान देण्यात आलेल्या एका इंजेक्शनमुळे अत्यंत दुर्मीळ स्वरूपाची औषध प्रक्रिया (ड्रग ॲलर्जी) झाली. त्यानंतर त्यांना झालेली उलटिचे अन्न व द्रव पदार्थ फुफ्फुसात गेल्यामुळे (अॅस्पिरेशन - Aspiration) श्वासोच्छ्वास अडथळ्यात आला, ज्यामुळे त्यांचा आणि गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. अहवालात वैद्यकीय कागदपत्रे व उपचार पद्धतीची छाननी करत उपचारादरम्यान डॉक्टरांचा कोणताही हलगर्जीपणा नसल्याचे सांगत त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.

कुटुंबीयांचा आणि विरोधकांचा आक्षेप समितीच्या या क्लीनचिटवर मृत महिलेचे पती करण डोंगरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ही चौकशी पूर्णपणे एकतर्फी असून समितीने केवळ डॉक्टरांचे जबाब नोंदवले, मात्र आमच्या कुटुंबाची किंवा नातेवाईकांची बाजू ऐकूनच घेतली नाही, असा गंभीर दावा त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने व ठिय्या आंदोलने केली होती. रुग्णालयातील उपचारपद्धती आणि वैद्यकीय सुविधांचा स्वतंत्र व निष्पक्ष पुर्नतपास करण्याची मागणी अद्याप कायम असून, या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *