
Pimpri : पवनेपेक्षा इंद्रायणीचे पाणी हे अधिक दूषित असल्याने महापालिकेला जलशुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. पवना नदीतील ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला सुमारे दहा कोटी रुपये, तर इंद्रायणी नदीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रियेसाठी सात कोटी रुपये खर्च होत आहेत.
पवना धरणातून नदीवाटे आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथे शुद्ध करुन संपूर्ण शहराला वितरित केले जाते. पवना नदीतून दररोज ५१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. रासायनिक द्रव्य, पावडरचा वापर करुन पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी एका वर्षाला दहा कोटी रुपयांचा खर्च येतो.
|
Pune : सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप ने सात थर लावून फोडली |
आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लिटर पाणी हे निघोज येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून उचलले जाते. अशुद्ध पाणी भूमिगत जलवाहिनीतून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे पाण्यावर प्रक्रिया करुन समाविष्ट भागातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध करण्यासाठी एका वर्षाला सात कोटी रुपयांचा खर्च येतो, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
आंद्रा धरण ते निघोजे बंधारा हे अंतर २२ किलोमीटर आहे. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूस ३४ गावे आहेत. नदीलगत चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीचा परिसर आहे. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. सांडपाणी थेट नदीत मिसळते. औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रीत पाणीही नदीत सोडण्यात येते. इंद्रायणीचे पाणी जास्त दूषित असल्याने शुद्धीकरणासाठी केमिकल आणि पावडरचा अधिक वापर करावा लागत आहे. परिणामी, इंद्रायणीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावरील प्रक्रियेसाठी वर्षाकाठी सात कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव पवना धरण ते रावेत बंधारा हे अंतर ३२ किलोमीटर आहे. पवना नदीच्या दोन्ही बाजूस बारा गावे आहेत. उर्सेत एमआयडीसी भाग असून मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. अनेक गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नाहीत. त्यामुळे नदी पाणी प्रदूषित होते. मात्र, त्याचे प्रमाण इंद्रायणी नदीपेक्षा कमी असल्याने पाणी शुद्धीकरणास खर्च कमी येतो.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!


























Subscribe to my channel


