नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.

नाशिक: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फुल्यानंतर आता नाशिक महापालिकेतील १२ नगरसेवकांच्या फुटीच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या 'डॅमेज कंट्रोल'साठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरले असून, नाशिकमधील सर्व १५ नगरसेवक आणि स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. १५) मुंबईतील 'मातोश्री'वर पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत ठाकरे नगरसेवकांशी 'वन-टू-वन' चर्चा करून त्यांच्या एकनिष्ठतेची खात्री करणार आहेत.

फुटीची धास्ती का?
राज्यात 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत शिवसेना (उबाठा) च्या नऊ पैकी सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याच धर्तीवर नाशिक महापालिकेतील १५ पैकी १२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेने पक्षनेतृत्वाचे टेन्शन वाढले आहे. जरी १३ नगरसेवकांनी आपण पक्षासोबतच असल्याचे जाहीर केले असले, तरी ठाकरे गट सावध झाला असून त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

 

ठाकरे गटाचे गंभीर आरोप:
गटनेते केशव पोरजे यांनी फुटीच्या चर्चांचा इन्कार करत नगरसेवक पक्षासोबत असल्याचे सांगितले. मात्र, काही मध्यस्थांमार्फत नगरसेवकांना पक्षांतरासाठी आमिषे दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. १० नगरसेवक सोबत आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन शिंदे गटाकडून दिले जात असल्याचे पोरजे यांनी म्हटले आहे.

एकनिष्ठतेची परीक्षा:
पक्षाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी नुकतीच नाशिकमध्ये नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, ज्यात सर्वांनी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिला होता. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच आता थेट उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधण्याचे ठरवले आहे. बुधवारी होणारी ही बैठक नाशिकच्या राजकारणात काय वळण घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *