
Mumbai : बीड जिह्यात मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात शांततेत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या विविध उपाययोजनांनंतरही शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह पुन्हा एकदा दिसून आला असून ग्रामीण भागातील मतदारांच्या उत्साहामुळे राज्यात सरासरी ६० -६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात चांगले मतदान झाले होते. तर शहरी भागात मतदारांमधील निरुत्साह दिसून आला होता. त्यानंतर शहरी भागातील विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयोगाने जनजागृतीसह विविध उपायोजना केल्या होत्या. मात्र आयोगाच्या या उपाययोजनानंतरही मतदानच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला नाही. राज्यातील अकोला, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नाशिक आदी जिह्यांतील काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. शेवटच्या दोन तासांत मतदानाने वेग घेतला. त्यामुळे हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.
बीडमध्ये मतदान केंद्रात तोडफोड
बीड जिल्हयातील परळी विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेचा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
|
Crime News : धक्कादायक! तरुणीच्या चेहऱ्यावर फासली मानवी विष्ठा, तोंडात कोंबून…; क्रूर कृत्याने खळबळ |
गडचिरोलीत सर्वाधिक
ग्रामीण भागातील मतदारांनी या वेळीही उत्साहात मतदान केले असून गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले असून त्या खालोखाल कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सांगली, वर्धा, यवतमाळ, सातारा जिह्यात सरासरी ६५ ते ७० टक्के दरम्यान मतदान झाले आहे. तर ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, नांदेड, नागपूर, अकोला जिल्ह्यात ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.
अपक्ष उमेदवाराचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे (४०) यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराने मृत्यू झाला. शिंदे सकाळी छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रांवर आले असताना त्यांना भोवळ आली. त्यांना आधी शहरातील आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



