
Mumbai : बीड जिह्यात मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात शांततेत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या विविध उपाययोजनांनंतरही शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह पुन्हा एकदा दिसून आला असून ग्रामीण भागातील मतदारांच्या उत्साहामुळे राज्यात सरासरी ६० -६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात चांगले मतदान झाले होते. तर शहरी भागात मतदारांमधील निरुत्साह दिसून आला होता. त्यानंतर शहरी भागातील विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयोगाने जनजागृतीसह विविध उपायोजना केल्या होत्या. मात्र आयोगाच्या या उपाययोजनानंतरही मतदानच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला नाही. राज्यातील अकोला, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नाशिक आदी जिह्यांतील काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. शेवटच्या दोन तासांत मतदानाने वेग घेतला. त्यामुळे हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.
बीडमध्ये मतदान केंद्रात तोडफोड
बीड जिल्हयातील परळी विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेचा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
|
Crime News : धक्कादायक! तरुणीच्या चेहऱ्यावर फासली मानवी विष्ठा, तोंडात कोंबून…; क्रूर कृत्याने खळबळ |
गडचिरोलीत सर्वाधिक
ग्रामीण भागातील मतदारांनी या वेळीही उत्साहात मतदान केले असून गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ७० टक्के मतदान झाले असून त्या खालोखाल कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सांगली, वर्धा, यवतमाळ, सातारा जिह्यात सरासरी ६५ ते ७० टक्के दरम्यान मतदान झाले आहे. तर ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, नांदेड, नागपूर, अकोला जिल्ह्यात ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.
अपक्ष उमेदवाराचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे (४०) यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराने मृत्यू झाला. शिंदे सकाळी छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रांवर आले असताना त्यांना भोवळ आली. त्यांना आधी शहरातील आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




