मुंबई: लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा प्रवाशांचे सामान किंवा मौल्यवान वस्तू विसरल्याच्या घटना घडतात आणि अशा हरवलेल्या वस्तू परत मिळणे जवळपास अशक्य मानले जाते. मात्र, मुंबईतून एका थक्क करणाऱ्या घटनेत, तब्बल तीन वर्षांपूर्वी लोकल ट्रेनमध्ये विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका प्रवाशाला सुरक्षितपणे परत मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आणि प्रयत्नांमुळे हा चमत्कार घडला असून प्रवाशाला त्यांचे १२ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जसेच्या तसे परत मिळाले आहेत.
नेमक काय घडलं होतं?
तल्हाह मोहम्मद झाकीर अन्सारी असे या प्रवाशाचे नाव असून ते २ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबरनाथहून सीएसएमटी (CSMT) कडे लोकल ट्रेनने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुर्ला रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने असलेली आपली महत्त्वाची बॅग बाजूला ठेवली होती. ट्रेन जेव्हा भायखळा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचली, तेव्हा अन्सारी घाईघाईत खाली उतरले, परंतु त्यांची सोन्याच्या दागिन्यांची बॅग लोकलच्या डब्यातच विसरली.
काही क्षणानंतर आपली बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब मागची लोकल पकडून थेट सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले. संबंधित लोकलमध्ये जाऊन त्यांनी बॅगेचा कसून शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही. अखेर हताश होऊन त्यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन आपल्या दागिन्यांची चोरी किंवा हरवल्याची अधिकृत तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या तपासामुळे लागला सुगावा:
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) कसून तपासले. बऱ्याच तांत्रिक तपासाअंती पोलिसांच्या हाती एक भक्कम सुगावा लागला आणि त्यांनी या प्रकरणी अख्तर हुसैन मुस्तफा हुसैन शेख या संशयित आरोपीला शोधून काढून बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १२ लाख १५ हजार रुपये मूल्याचे संपूर्ण सोन्याचे दागिने सुरक्षितपणे जप्त केले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण करून पोलिसांनी जप्त केलेले हे सोने व मौल्यवान ऐवज तक्रारदार तल्हाह अन्सारी यांच्याकडे सुपूर्द केला. तब्बल तीन वर्षांनंतर आपले हरवलेले व अफाट मूल्याचे सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाल्यामुळे प्रवाशाने पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले असून मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



