माहिती अधिकार (RTI) नियमांमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त बदलांवर अखेर महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्र पाठवत राज्य सरकारने सुधारित नियमांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
राज्य सरकारने जून २०२६ मध्ये माहिती अधिकार नियमांमध्ये काही बदल केले होते. या बदलांमुळे माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक कठीण होईल, पारदर्शकतेवर परिणाम होईल आणि नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर मर्यादा येतील,
असा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. त्यांनी सरकारला नियम मागे घेण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना पत्र लिहून राज्य सरकारने सुधारित नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले. तसेच संबंधित नियमांचा फेरआढावा घेण्यासाठी आणि विविध स्तरांवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अण्णा हजारे यांनी यापूर्वी माहिती अधिकार कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी मोठी आंदोलने केली होती. यावेळीही त्यांनी सुधारित नियमांमुळे माहिती अधिकार कायद्याची धार बोथट होईल, असा आरोप करत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. सरकारच्या निर्णयानंतर हा वाद तात्पुरता शांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, पुढील नियमावली तयार करताना नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. आता सुधारित नियमांबाबत सरकार पुढे कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- गोव्यात जन्म-मृत्यू नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाइन; १ जुलैपासून केंद्रीय CRS पोर्टलवरूनच होणार सर्व प्रक्रिया!
महाराष्ट्र
- शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार महा-धरणे आंदोलन!
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रोडवर १५ दिवसांपासून वाहतेय मुतारीचे पाणी; प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर!
- नागपूर: महाराष्ट्रातील १०% महाविद्यालये पाच वर्षांत बंद; AISHE अहवालातून मोठा खुलासा
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- कोकणात पावसाचा हाहाकार; ५ जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' कायम! केरळ ते महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय.



























Subscribe to my channel

