तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत.आयआयटीमध्येही २०२४ मध्ये ३८% विद्यार्थीअसे होते, ज्यांना कॅम्पस प्लेसमेंटदरम्याननोकरीचा एकही प्रस्ताव मिळाला नाही. चांगल्या रोजगाराच्या शोधात अनेक भारतीय इतर देशांतजात आहेत. हे खरे आहे की, भारताचा आर्थिक विकास दर अद्यापचांगला नोंदवला जात आहे. परंतु आता पूर्वीसारखाउत्साह किंवा विश्वास दिसून येत नाही. देशातील परकीयभांडवलाचा ओघ आटत चालला आहे, जे या गोष्टीचेसंकेत आहेत की बाह्य गुंतवणूकदारांना असे वाटते की,८% पेक्षा जास्त सांगितल्या जाणाऱ्या जीडीपी (GDP)विकास दरामागे काही मूलभूत गोष्टींचा कमकुवतपणालपलेला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे,सामान्यतः कोणत्याही देशात कॉर्पोरेट महसूलअर्थव्यवस्थेच्या बरोबरीनेच वाढतो किंवा घटतो. परंतुगेल्या वर्षी भारतात सूचीबद्ध कंपन्यांचा कॉर्पोरेट महसूलवाढीचा दर, जीडीपी वाढीच्या तुलनेत जेमतेम अर्धा होता.जीडीपीच्या आकड्यांनी समाधानी राहण्याऐवजीभारताच्या धोरणकर्त्यांना समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल.कमकुवतपणाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक म्हणजे, पूर्वीपेक्षा जास्त लोक भारत सोडून जात आहेत आणि देश खूपकमी भांडवल आकर्षित करू शकत आहे. या दशकातदरवर्षी सरासरी ६.७५ लाख लोक भारतातून बाहेर जाऊन स्थायिक होत आहेत, तर २०१० च्या दशकात ही संख्या३.२५ लाख होती. पाकिस्तान, बांगलादेश आणियुक्रेनमध्येच यापेक्षा मोठे स्थलांतर झाले आहे. चीनमध्ये अजूनही गेल्या दशकाप्रमाणेच दरवर्षी सुमारे ३ लाखलोक देश सोडत आहेत. भारतातून बाहेर जाणाऱ्यांमध्ये‘ब्रेन ड्रेन’चा मोठा वाटा आहे. म्हणजेच तेच कुशलव्यावसायिक ज्यांची गरज भारताला प्रगत क्षेत्रांत स्पर्धाकरण्यासाठी हवी आहे. याचा परिणाम असा झाला की,आज सिलिकॉन व्हॅलीच्या तांत्रिक कार्यबलापैकी सुमारेएक तृतीयांश हिस्सा भारतीयांचा झाला आहे. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. अगदी नामांकितआयआयटीमध्येही २०२४ मध्ये ३८% विद्यार्थी असे होते,ज्यांना कॅम्पस प्लेसमेंटदरम्यान नोकरीचा एकही प्रस्तावमिळाला नाही. चांगल्या रोजगाराच्या शोधात अनेकभारतीय त्या मोजक्या देशांकडे जात आहेत, जे अजूनहीस्थलांतरितांसाठी तुलनेने अनुकूल आहेत - जसे की यूएईआणि सौदी अरेबिया. जिथे बांधकामांमधील तेजीने त्यांनाआकर्षित केले आहे. भारत दीर्घकाळापासून परदेशातूनमर्यादित प्रमाणातच भांडवल आकर्षित करू शकला आहे,ज्याचे एक मोठे कारण अजूनही अस्तित्वात असलेले‘लायसन्स राज’ आहे. हे जमीन मिळवणे किंवाकामगारांची नियुक्ती किंवा कपात करण्याची प्रक्रियाअत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीची बनवते. ज्या आशियाईअर्थव्यवस्थांनी जलद आणि शाश्वत वृद्धी नोंदवली आहे.जसे की, पूर्वी चीन आणि अलीकडच्या वर्षांत व्हिएतनाम- त्यांच्या तेजीच्या काळात निव्वळ एफडीआयजीडीपीच्या ४% च्या वर पोहोचला होता. भारतात हाआकडा कधीही १.५% च्या पुढे जाऊ शकला नाही आणिआता तर तो घसरून अवघा ०.१% झाला आहे. गेल्यादशकात, निव्वळ एफडीआय/जीडीपीच्या आधारावरभारताची रँकिंग २५ सर्वात मोठ्या उदयोन्मुख देशांमध्ये १२व्या स्थानावरून घसरून १९ व्या स्थानावर आली आहे. व्यवसायासाठी एक कठीण ठिकाण असण्याच्याभारताच्या जुन्या प्रतिमेव्यतिरिक्त काही नवीन धोकेदेखीलपरदेशी गुंतवणूकदारांना रोखत आहेत. यामध्ये शेजारीलदेशांशी नवी दिल्लीचे बिघडलेले संबंध, अमेरिकेसोबतचेटॅरिफ युद्ध आणि भारताच्या तांत्रिक क्षमतेबद्दलची शंकायांचा समावेश आहे. चीन आणि तैवान त्यांच्याजीडीपीच्या २.५% पेक्षा जास्त संशोधन आणि विकासावरखर्च करतात, तर भारतात हा खर्च गेल्या वर्षी अवघा०.६५% होता. अशा परिस्थितीत एआयच्या क्षेत्रातभारताकडे कोणतीही मोठी नावे नाहीत, यात नवल नाही. या कमकुवतपणाचा परिणाम वित्तीय बाजारांवरही होतआहे. दीर्घकाळानंतर, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या शेअरबाजारात गेल्या वर्षी अखेर निव्वळ गुंतवणूक प्रवाहपरतला. पण भारतात याउलट १९ अब्ज डॉलर्सचा रेकॉर्डनेट आऊट-फ्लो (भांडवल बाहेर जाणे) दिसला. परदेशीगुंतवणूकदारांच्या मोठ्या विक्रीचा सामना देशांतर्गतगुंतवणूकदारांनी केला, जिथे कुटुंबांनी इक्विटीमध्येआपला हिस्सा वाढवण्यात ऐतिहासिकदृष्ट्या कमी रसदाखवला. असे असूनही, भारतीय शेअर बाजार गेल्यावर्षी आपल्या समकक्ष देशांच्या तुलनेत बराच मागेराहिला. वेगवान वाढीसाठी भारताला अधिक परकीयभांडवलाची गरज आहे, कारण त्याचा देशांतर्गत बचतीचाआधार पुरेसा नाही. पूर्व आशियातील आर्थिकचमत्कारांच्या विपरीत भारताचे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रकमकुवत राहिले आहे, त्यामुळे तो कधीही निर्यातीतमहासत्ता बनू शकला नाही आणि जवळजवळ नेहमीचचालू खात्यातील तुटीत राहिला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
महाराष्ट्र
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- पुणेकर कुटुंबावर काळाचा घाला! कोल्हापुराजवळ भीषण अपघात; आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत
गुन्हा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
- बिहार हादरलं! शिक्षकाच्या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुष छळवणूक; शाळेकडून बळजबरीने थामवला दाखला (TC)
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम





















Subscribe to my channel




