लातूर: लातूर शहर आणि परिसरात सध्या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शहरात श्वानदंशाच्या (Dog Bite) घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली असून, दररोज सरासरी ६० लोकांना कुत्री चावा घेत आहेत.
गेल्या साडेचार महिन्यांत तब्बल ९ हजार ७८९ जणांना मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
या वाढत्या दहशतीदरम्यान, एका २२ वर्षीय तरुणाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण लातूर शहरात प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाचा लचके तोडून घेतला बळीमिळालेल्या माहितीनुसार, विलास बोरवे (वय २२ वर्षे) हा तरुण स्थानिक मच्छी मार्केट परिसरात गेला होता. तिथे अचानक ४ ते ५ हिंस्र कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे गंभीर लचके तोडले.
त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
कुटुंबातील कमावता तरुण अशा प्रकारे गमावल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेह थेट महानगरपालिकेच्या दारात आणून तीव्र आंदोलन केले. पालिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश करत नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला.
साडेचार महिन्यांत भयानक आकडेवारीलातूर शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तब्बल ९,७८९ श्वानदंशाच्या केसेसची नोंद झाली आहे.
हा आकडा केवळ सरकारी रुग्णालयातील असून, खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोजल्यास हा आकडा याहून मोठा असण्याची शक्यता आहे. लहान मुले, महिला आणि रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना या कुत्र्यांचा सर्वाधिक फटका बसत आहे. प्रशासकीय अनास्था आणि नसबंदी मोहिमेचा फज्जामहानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवण्यात येणारी नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक मोहीम पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आणि उघड्यावरील अन्नपदार्थ यामुळे कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या प्राणघातक घटनेनंतर आता तरी लातूर महानगरपालिका जागे होऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का, असा संतप्त सवाल लातूरकर विचारत आहेत.
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




