कोल्हापूर: महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळातून एक अत्यंत संतापजनक आणि चक्क विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर येथील प्रतिष्ठित अशा शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा एक कारभार सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका बाजूला आर्थिक अडचणीत असलेल्या किंवा वेळत फी न भरू शकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यापासून, प्रवेशासाठी, गुणपत्रिका मिळवण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक सेवांसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून सतत तगादा लावला जातो आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. मात्र, दुसरीकडे विद्यापीठाच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व अनास्थेमुळे झालेला तब्बल ५७ हजार ३२४ रुपयांचा आयकर (Income Tax) दंड चक्क विद्यार्थ्यांच्या फीमधून गोळा केलेल्या निधीतून भरण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आयकर संदर्भातील देय, टीडीएस किंवा इतर आर्थिक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे किंवा अनवधानाने बँकेत योग्य वेळी भरणा न केल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून हा दंड आकारण्यात आला होता. नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या किंवा संबंधितांच्या वैयक्तिक वा प्रशासकीय चुकीमुळे लागलेला हा दंड संबंधित जबाबदार व्यक्तींकडून वसूल करणे अपेक्षित होते. परंतु, तो दंड कर्मचाऱ्यांकडून वसूल न करता थेट विद्यापीठाच्या विद्यार्थी निधीतून, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व विकासासाठी जमा होणाऱ्या पैशातून भरण्यात आला.
विद्यापीठाच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थी संघटना, पालक आणि विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या सुविधांसाठी वापरला जाणारा निधी अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या चुका झाकण्यासाठी आणि त्यांचा दंड भरण्यासाठी वापरणे पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे. एका बाजूला गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत असताना आणि फी भरण्यास उशीर झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असताना, विद्यापीठ प्रशासन मात्र स्वतःच्या चुका लपवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाच्या या मनमानी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




