कोल्हापूर: महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळातून एक अत्यंत संतापजनक आणि चक्क विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर येथील प्रतिष्ठित अशा शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा एक कारभार सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका बाजूला आर्थिक अडचणीत असलेल्या किंवा वेळत फी न भरू शकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यापासून, प्रवेशासाठी, गुणपत्रिका मिळवण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक सेवांसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून सतत तगादा लावला जातो आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. मात्र, दुसरीकडे विद्यापीठाच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व अनास्थेमुळे झालेला तब्बल ५७ हजार ३२४ रुपयांचा आयकर (Income Tax) दंड चक्क विद्यार्थ्यांच्या फीमधून गोळा केलेल्या निधीतून भरण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आयकर संदर्भातील देय, टीडीएस किंवा इतर आर्थिक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे किंवा अनवधानाने बँकेत योग्य वेळी भरणा न केल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून हा दंड आकारण्यात आला होता. नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या किंवा संबंधितांच्या वैयक्तिक वा प्रशासकीय चुकीमुळे लागलेला हा दंड संबंधित जबाबदार व्यक्तींकडून वसूल करणे अपेक्षित होते. परंतु, तो दंड कर्मचाऱ्यांकडून वसूल न करता थेट विद्यापीठाच्या विद्यार्थी निधीतून, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व विकासासाठी जमा होणाऱ्या पैशातून भरण्यात आला.
विद्यापीठाच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थी संघटना, पालक आणि विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या सुविधांसाठी वापरला जाणारा निधी अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या चुका झाकण्यासाठी आणि त्यांचा दंड भरण्यासाठी वापरणे पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे. एका बाजूला गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत असताना आणि फी भरण्यास उशीर झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असताना, विद्यापीठ प्रशासन मात्र स्वतःच्या चुका लपवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाच्या या मनमानी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




