नवी दिल्ली: देशाच्या अर्थव्यवस्थेने ७.८ टक्क्यांनी मजबूत वाढ नोंदवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक विशेष रील शेअर करत देशाला संदेश देताना पंतप्रधान मोदींनी जगातील सद्यस्थिती आणि भारताची प्रगती यावर विस्तृत भाष्य केले. तसेच, देशांतर्गत विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
जगभरात संकट, पण भारत वेगाने प्रगतीपथावर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, संपूर्ण जग आज युद्धाच्या छायेत आणि चौफेर संकटात सापडले आहे. जगभरात पुरवठा साखळी (सप्लाय चेन) पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. २०२० मध्ये कोरोनाचे संकट आल्यापासून जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये अद्यापही स्थैर्य आलेले नाही. मात्र, या सर्व प्रतिकूल आणि जागतिक पातळीवरील अनिश्चित वातावरणातही भारताने विकासाचा वेग कायम राखला असून अर्थव्यवस्था वाढीची नवी उंची गाठली आहे. हा भारताच्या सामूहिक शक्तीचा आणि देशवासीयांच्या पुरुषार्थाचा विजय आहे.
'झूठ की गुंज'मधून निराशा पसरवण्याचे काम: एकतर्फा देश विकासाची नवनवीन शिखरे सर करत असताना, दुसरीकडे देशांतर्गत पातळीवर काही लोक निराशेच्या गर्तेत बुडालेले आहेत. 'झूठ की गुंज' (खोट्याचे वातावरण) निर्माण करून सर्वत्र निराशा पसरवण्याचे काम काही घटकांकडून केले जात आहे, असा खोचक टोला पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता लगावला. या सर्व नकारात्मक गोष्टींवर आणि निराशेच्या वातावरणावर मात करत देशाने ७.८ टक्के वाढ शक्य करून दाखवली आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा मंत्र: देशाची ही विकासाची गती केवळ कायमच ठेवायची नाही, तर ती आणखी वाढवायची आहे. यासाठी प्रत्येकाने 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वदेशी' या मंत्रावर जास्तीत जास्त भर देणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशवासीयांना संबोधित करताना त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे सुचवले:
-
परदेशात पर्यटनाला जाण्याची किंवा फिरण्याची योजना आखत असाल, तर तसे करणे टाळा.
-
परदेशात जाऊन महागडी डेस्टिनेशन वेडिंग करणे थांबवा.
-
'मेड इन इंडिया' आणि 'लोकल फॉर व्होकल' या मंत्राचा अवलंब करा.
-
कोणतीही अतिआवश्यक गरज नसेल, तर सोने खरेदी करणे टाळा.
पुढच्या पिढीसाठी विकसित भारताचे ध्येय: आपण स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर जेवढा जास्त भर देऊ, तेवढा देशाचा पाया बळकट होईल. हाच वेग आणि समृद्धी आपल्याला पुढे न्यायची आहे. येत्या काळात सक्षम आणि समृद्ध असा 'विकसित भारत' पुढील तरुण पिढीच्या हाती सुपूर्द करायचा आहे, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
शहर
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
महाराष्ट्र
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel

