मुंबई: सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच मुंबईकरांना महागाईचा अत्यंत जोरदार फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर तब्बल ९ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली असून, ऐन सणासुदीच्या हंगामात घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुट्या दुधाचे दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपयांवर: 'मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन'ने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील घाऊक आणि किरकोळ दूध दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे यापूर्वी ९३ रुपये प्रति लिटर असणारे सुट्या दुधाचे दर आता थेट १०२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे किरकोळ विक्रीचे दर प्रति लिटर ११० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसारख्या महानगरात घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे.
दूध दरवाढीमागची प्रमुख कारणे: दूध उत्पादक आणि विक्रेत्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, मागील काही महिन्यांत दुधाच्या उत्पादनात आणि व्यवस्थापनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दरवाढीची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत: १. पशुखाद्याचे वाढलेले दर: मागील वर्षभरात पशुखाद्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये दाणा, तूरचुणी, चणाचुणी, ढेमसा, चारा आणि पेंड यांच्या किमती तब्बल २५ टक्क्यांनी वधारल्या आहेत. २. जनावरांच्या खरेदी किमतीत वाढ: दुधाळ जनावरे खरेदी करणे आणि त्यांचे संगोपन करणे आता पूर्वीपेक्षा खूप महाग झाले आहे. ३. अन्न व औषध प्रशासन (FDA) कडक कारवाई: नुकतीच अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) भेसळयुक्त दुधाविरोधात अतिशय कठोर कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात अस्सल आणि शुद्ध दुधाची मागणी वाढली असून त्याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे.
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भार: सध्या सप्टेंबर महिन्याची सुरुवात होत असून अवघ्या काही दिवसांतच गोपाळकाला, लाडक्या बाप्पाचे आगमन म्हणजेच गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्र आणि दिवाळी यांसारखे मोठे सण व उत्सव सुरू होत आहेत. या सणासुदीच्या काळात दूध, दही, खवा, तूप, पनीर आणि विविध प्रकारच्या मिठाईची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. मात्र, दुधाच्या मुळ किमतीतच ९ रुपयांची वाढ झाल्यामुळे फराळ, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे भाव देखील १० टक्क्यांहून अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.
शहर
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




