आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पाणउतारा केला आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत वि. पाकिस्तान असा झालेला सामना पाक क्रिकेकप्रेमींसाठी एक दुस्वप्न ठरलं आहे, सगळ्यानंच ते विसरायची इच्छा आहे, पण दुर्दैवाने ते शक्य नाही. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये रविवारी रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं आणि 61 धावांनी शानदार विजय मिळवला. 176 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा खेळ 114 धावांवरच आटोपला आणि भारताने सुपर-8मध्ये शानदार पद्धतीने धडक मारली.
भारताकडून हा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर, पाकिस्तानमध्ये दु:खाचं वातावरण असून पाकचा माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा तर अगदी तिळपापड झाल्याचं पहायला मिळालं. शोएब अख्तरने पराभवानंतर थयथयाट केलाच पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावरही जोरदार टीका केली.
शोएब अख्तरने मोहसीन नक्वींची इज्जतच काढली
पाकच्या पराभवानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शोएब अख्तर स्पष्टच बोलला. क्रिकेट माहित नसलेली व्यक्ती पीसीबीचा अध्यक्ष आहे, त्यामुळेच पाकिस्तान संघासोबत हे घडत असल्याचं त्याने नमूद केला. ” एक माणूस ज्याला काही येत नाही, काही माहीत नाही, तो पाकि्तान क्रिकेट बोर्डाचा चेअरमन ( मोहसीन नक्वी) बनला आहे. तुम्ही काय करू शकता ? अशाने संघ कसा चालणार ? तुम्ही एका खेळाडूला (बाबर आझम) सुपरस्टार बनवलं आहे, पण तो तुम्हाला एकही सामना जिंकून देऊ शकत नाही ” अशा शब्दांत शोएब अख्तरने मनातली सगळी भडास बाहेर काढली. त्याचा रोख स्पष्टपणे नक्वी आणि बाबार आझम कडे होता.
तो एवढ्यावरच थांबला नाही, पुढे तो म्हणाला, ‘ जेव्हा अशा लोकांना स्टार बनवलं जातं, त्यांची निवड केली जाते तेव्हा प्रॉब्लेम तर येणारच. पण जगातला सगळ्यात मोठा गुन्हा काय माहीत आहे का ? जगातला सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे एखाद्या अयोग्य आणि अकार्यक्षम व्यक्तीला काम देणं. जेव्हा तुम्ही एखाद्या अयोग्य आणि अज्ञानी व्यक्तीला कामावर ठेवता तेव्हा ते तुमचा देश उद्ध्वस्त करतात. ते कोणत्याही संघटनेला पाडू शकतात. उदाहरणं तुमच्या समोर आहेत. तुम्ही हे समजून घेण्याइतके हुशार आहात.” असं म्हणत त्याने पराभवानंतर नक्वींवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
पाकचा नामिबियाशी सामना
रविवारी भारताकडून हार मिळाल्यानंतर पाकिस्तान आता ग्रुप ए पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्यावरती अमेरिकेचा संघ आहे. दोन्ही संघाचे 4-4 पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना नामिबियाविरुद्ध असेल. सुपर 8 मध्ये धडक मारण्यासाठी त्यांना नामिबियाला हरवावंच लागेल.
भारताचा शानदार विजय
भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध एकूण नऊ सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ सामने भारताने जिंकलेत. यापैकी एक सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. तर, पाकिस्तानने 2021 साली मध्ये भारताविरुद्धचा एकमेव टी20 वर्ल्डकप मॅच जिंकली आहे. काल पाकने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर पहिले फलंदाजी करताना भारताने 7 विकेट गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियाकडून इशान किशनने 40 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी संघाचा खेळ 18 षटकांत फक्त 114 धावांवर आटोपला. पापकडून उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने नाबाद 23 धावांचे योगदान दिले.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



