आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पाणउतारा केला आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत वि. पाकिस्तान असा झालेला सामना पाक क्रिकेकप्रेमींसाठी एक दुस्वप्न ठरलं आहे, सगळ्यानंच ते विसरायची इच्छा आहे, पण दुर्दैवाने ते शक्य नाही. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये रविवारी रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं आणि 61 धावांनी शानदार विजय मिळवला. 176 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा खेळ 114 धावांवरच आटोपला आणि भारताने सुपर-8मध्ये शानदार पद्धतीने धडक मारली.
भारताकडून हा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर, पाकिस्तानमध्ये दु:खाचं वातावरण असून पाकचा माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा तर अगदी तिळपापड झाल्याचं पहायला मिळालं. शोएब अख्तरने पराभवानंतर थयथयाट केलाच पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावरही जोरदार टीका केली.
शोएब अख्तरने मोहसीन नक्वींची इज्जतच काढली
पाकच्या पराभवानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शोएब अख्तर स्पष्टच बोलला. क्रिकेट माहित नसलेली व्यक्ती पीसीबीचा अध्यक्ष आहे, त्यामुळेच पाकिस्तान संघासोबत हे घडत असल्याचं त्याने नमूद केला. ” एक माणूस ज्याला काही येत नाही, काही माहीत नाही, तो पाकि्तान क्रिकेट बोर्डाचा चेअरमन ( मोहसीन नक्वी) बनला आहे. तुम्ही काय करू शकता ? अशाने संघ कसा चालणार ? तुम्ही एका खेळाडूला (बाबर आझम) सुपरस्टार बनवलं आहे, पण तो तुम्हाला एकही सामना जिंकून देऊ शकत नाही ” अशा शब्दांत शोएब अख्तरने मनातली सगळी भडास बाहेर काढली. त्याचा रोख स्पष्टपणे नक्वी आणि बाबार आझम कडे होता.
तो एवढ्यावरच थांबला नाही, पुढे तो म्हणाला, ‘ जेव्हा अशा लोकांना स्टार बनवलं जातं, त्यांची निवड केली जाते तेव्हा प्रॉब्लेम तर येणारच. पण जगातला सगळ्यात मोठा गुन्हा काय माहीत आहे का ? जगातला सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे एखाद्या अयोग्य आणि अकार्यक्षम व्यक्तीला काम देणं. जेव्हा तुम्ही एखाद्या अयोग्य आणि अज्ञानी व्यक्तीला कामावर ठेवता तेव्हा ते तुमचा देश उद्ध्वस्त करतात. ते कोणत्याही संघटनेला पाडू शकतात. उदाहरणं तुमच्या समोर आहेत. तुम्ही हे समजून घेण्याइतके हुशार आहात.” असं म्हणत त्याने पराभवानंतर नक्वींवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
पाकचा नामिबियाशी सामना
रविवारी भारताकडून हार मिळाल्यानंतर पाकिस्तान आता ग्रुप ए पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्यावरती अमेरिकेचा संघ आहे. दोन्ही संघाचे 4-4 पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना नामिबियाविरुद्ध असेल. सुपर 8 मध्ये धडक मारण्यासाठी त्यांना नामिबियाला हरवावंच लागेल.
भारताचा शानदार विजय
भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध एकूण नऊ सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ सामने भारताने जिंकलेत. यापैकी एक सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. तर, पाकिस्तानने 2021 साली मध्ये भारताविरुद्धचा एकमेव टी20 वर्ल्डकप मॅच जिंकली आहे. काल पाकने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर पहिले फलंदाजी करताना भारताने 7 विकेट गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियाकडून इशान किशनने 40 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी संघाचा खेळ 18 षटकांत फक्त 114 धावांवर आटोपला. पापकडून उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने नाबाद 23 धावांचे योगदान दिले.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



