भारतीय क्रिकेट संघाने आपला दबदबा कायम राखत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 या मोहिमेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा पाकिस्तान विरुद्धचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. इशान किशन याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 175 धावा केल्या. इशानने 77 धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादव याने 32, शिवम दुबे 27 आणि तिलक वर्मा याने 25 धावांचं योगदान दिलं. भारताने अशाप्रकारे पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाकिस्तानला 114 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने या विजयासह सुपर 8 फेरीत प्रवेश केला. भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने या विजयाचं श्रेय कुणाला दिलं? सूर्या काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
सूर्या टीम इंडियाच्या कामगिरीमुळे आनंदी
“हे भारतासाठी आहे. या खेळपट्टीवर पहिले बॅटिंग करणं हा सर्वोत्तम पर्याय होता. पहिल्या डावात बॅटिंग करताना विजयासाठी किती आव्हान द्यायचं सागणं अवघंड होतं. मात्र स्कोअरबोर्डवर 175 धावा लागल्यानंतर आम्ही 15-20 धावा जास्त केल्यात असं आम्हाला वाटलं. मात्र 155 धावा केल्या असत्या तर सामना अटीतटीचा झाला असता”, असं सूर्याने नमूद केलं.
सूर्याने विजयानंतर बोलताना आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला. ते तसेच खेळले जसं अपेक्षित होतं, असं सूर्याने सांगितलं.
“आम्ही तसंच खेळलो जसं आम्हाला अपेक्षित होतं. इशान किशन यानेही त्याच प्रकारे बॅटिंग केली (ज्याप्रकारे इशानने गेल्या काही सामन्यांत आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत केली). 1 धावेवर विकेट गमावल्यानंतर कुणाला तरी जबाबदारी घ्यायची होती. इशानने जबाबदारी घेऊन चांगली कामगिरी केली”, असं म्हणत सूर्याने इशानच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला.
सूर्याने इशान व्यतिरिक्त टीम इंडियाच्या तिघांचं नाव घेतलं. सूर्याने तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकु सिंह या तिघांच्या बॅटिंगचं कौतुक केलं. “ज्या पद्धतीने त्यांनी (तिलक, शिवम आणि रिंकु) बॅटिंग केली ते कौतुकास पात्र आहेत”, असं कर्णधार म्हणाला.
गोलंदाजांचाही उल्लेख
सूर्या फलंदाजांचं कौतुक करताना गोलंदाजांचं योगदान विसरला नाही. सूर्याने गोलंदाजांचा उल्लेख करत त्यांनाही श्रेय दिलं. “हार्दिक पंड्या याने नव्या चेंडूने धमाका केला. त्यानंतर जसप्रीत बुमराह यानेही तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज का आहे दे दाखवून दिलं. विजयात सर्वांनी दिलेलं योगदान पाहून फार चांगलं वाटलं”, असं म्हणत सूर्याने संघाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



