
Bihar : बिहार विधानसभेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहेत. गेल्या वेळी ५० पेक्षा कमी जागांवर आलेले जेडीयूनं यावेळी ८० जागा मिळावल्या आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए बिहारमध्ये २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतलीय. भाजप,जेडीयू,एलजेपी, आरएलएम आणि एचएएम या पाच पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएसमोर महाआघाडी चारी मुंड्या चीत झालीय. त्यांच्या संपूर्ण मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. राजद आणि काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी घसरण झालीय.
एनडीएच्या मोहिमेचा केंद्रबिंदू मुख्यमंत्री महिला रोजगार योजना होती. ७,५०० कोटी रुपयांच्या योजनेने एनडीएसाठी बेरीजेचं काम केलं. या योजनेतून १.२ कोटी महिलांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं महिलांना प्रत्येकी १०,००० रुपये दिले. फक्त हीच योजना नाही तर दीर्घकाळापासून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या योजनांमुळे जेडीयूला मोठं यश मिळालंय.
|
|
मग यात २००६ मधील ५० टक्के पंचायत आरक्षण, ते राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३५ टक्के आरक्षण यासारख्या अनेक महिला सबलीकरणाच्या योजनांमुळे नितीश ैकुमार यांनी विजय मिळवला.
नितीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच महिलांवर लक्ष केंद्रित केल होतं. यातील सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे २००६ मध्ये सुरू झालेली सायकल आणि गणवेश योजना. जेव्हा बिहारच्या मुली सायकलवरून शाळेत जाऊ लागल्या, तेव्हा ते चित्र योजनेचे यश न राहता सामाजिक बदलाचे पोस्टर देखील बनलंय. त्यानंतर २००६ मध्ये पंचायती राज कायदा अंतर्गत पंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण त्यांनी दिले. या निर्णयामुळे तळागाळातील पातळीवर महिलांचा राजकीय सहभाग वाढला.
त्यानंतर नितीश कुमार यांनी २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात दारुबंदी लागू केली. दारू निर्मितीवर सुद्धा त्यांनी बंदी आणली होती. यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली. परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या मनात नितीश कुमार समाज सुधारक नेता असल्याची प्रतिमा बनली.
मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत नितीश कुमार यांच्या सरकारने बचत गटांशी संबंधित १.३ कोटी 'जीविका दिदी'च्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये थेट हस्तांतरित केले. ही योजना नितीश कुमार यांच्यासाठी संजीवनी ठरली. या योजनेतून एकूण १.४ कोटी महिलांना लाभ मिळाला.
राज्यातील अंदाजे ३.५ कोटी मतदारांपैकी जवळजवळ ४०% आहे. योजनेतून मिळालेली १० हजार रुपयांची मदत महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्यात आली होती. या महिला योजनांचा फायदा नितीश कुमार यांना फायदा मिळाला.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ३८ पैकी ३७ जिल्ह्यांमध्ये महिलांनी भरभरून मते दिली. पुरुषांपेक्षा जास्त मतदान महिलांनी केलं. महिलांचे मतदान ७१.७८ टक्के होतं. तर पुरुषांचे मतदान ६२.९८ टक्के होते. हे बिहारमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक ६७.१३ टक्के मतदान झाले.
आर्थिक पाठिंब्याव्यतिरिक्त भावनिक घटकाने देखील मतदानावर प्रभाव पाडला. दारूबंदीनंतर राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवल्याने जनमाणसात नितीश कुमार यांची प्रतिमा समाज सुधारक नेता म्हणून झाली होती. दरम्यान नितीश कुमार यांची ही निवडणूक अखेरची निवडणूक आहे, असं अनेकांना वाटून लागलं. यामुळे बिहारला 'जंगल राज' पासून वाचवणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




