
अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावूकही झाले तसंच आक्रमही झाल्याचं पाहण्यास मिळाले. प्राण गेला तरीही आता मागे हटणार नाही. मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळ दिला आहे. तरीही आरक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे मुंबईला गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सात दिवसांमध्ये आम्ही मुंबईला पोहचणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठ्यांची एकजूट मोडू नका :
माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाहीये. पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आमचं आंदोलन मुंबईत पोहचल्यावर कोट्यवधी मराठे मुंबईत दिसणार आहेत. राज्यभर आम्ही आमच्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लढणार आहोत. ही आरपारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठा बांधवांना विनंती आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारशी काहीही चर्चा झालेली नाही. आमचं म्हणणं सरकारला माहीत आहे. चर्चा किती दिवस करणार? सरकार मराठ्यांना वेठीस धरणार असेल आणि तर आम्ही आजपासूनच उपोषण करत मुंबईला जाणार असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. याबाबत माझ्या समाजाशी बोलून याबाबत निर्णय घेणार आहे. आम्ही सामंज्यसाची भूमिका घेतल्यानेच आम्ही सात महिने वेळ दिला आहे.
सरकारला झोप कशी येते? :
आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे. अनेक घरांमधला कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
सरकार इतकं नालायक कसं काय असू शकतं? :
५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. ४५ वर्षांपासून लढा सुरु आहे. सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं. ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं, आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही? गोरगरीबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही? हा अन्यायाचा कळस झाला आहे. डोळ्यांदेखत आत्महत्या होत आहेत तरीही सरकारला झोप कशी लागते? मुंबईत काहीही झालं तरीही हरकत नाही आम्ही मागे फिरणार नाही. पैठणचा एक मराठा बांधव याचा मुलगा तीन महिन्यापूर्वी गेला. तरीही त्याने मला येऊन सांगितलं माझा मुलगा गेला असला तरीही आपण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही. सरकार इतकं नालायक असू शकतं का? पोरांचे बळी जाऊनही ते हक्काचं आरक्षण देत नाही? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
शहर
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




