राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आहे, या लेखामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा केला आहे. विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडेच देणार होतो, पण अजित पवार यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, आता अजितदादांचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. तसेच अदृश्य शक्तिच्या कारवायामुळे राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अजित पवार यांना वेगळा गट स्थापन करावा लागला, मात्र झालेली चूक दुरुस्त करायची या विचाराने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दादा कामाला लागले होते, असा मोठा दावा देखील या लेखात शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान शिंदे यांच्या या लेखावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी शशिकांत शिंदे याचा हा दावा फेटाळून लावतानाच त्यांना इशारा देखील दिला आहे. ‘अशावेळी शशिकांत शिंदेंनी असं विधान करायला नको होतं. भाजपसोबत असलं पाहिजे ही दादांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. २०१४मध्ये होती. २०१६ मध्ये देखील इच्छा होती. त्यावेळी चर्चा अंतिम टप्प्यात झाली होती. २०१९ मध्ये तर भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकतं. केंद्राची मदत होऊ शकते असं दादांनी म्हटलं होतं. त्यामुळे शशिकांत शिंदेंनी म्हटलं ते अनाठायी आहे. ते वेगळं काही तरी साधू पाहत आहेत. त्यांना नेमकं काय बोलायचं त्यांचं त्यांना माहीत. ते जबाबदार नेते आहेत. पण हे लिहिण्याचं कारण काय? असा सवाल यावर आता तटकरे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे मासिक दर महिन्याला येतं. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मासिक येतं. योगायोगाने ते १२ तारखेला आलं की मुद्दाम १२ तारखेला मासिक बाजारात आलं माहीत नाही, असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शशिकांत शिंदेंनी काहीही बोलू नये. अमूक अमूक कारणानं किंवा वैतागून अजितदादांनी निर्णय घेतला असं ते म्हणत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना योग्य त्या पद्धतीने उत्तर देईन, असा इशाराही यावेळी तटकरे यांनी शशिकांत शिंदे यांना दिला आहे. तसेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना समोरून प्रस्ताव आला तर चर्चा करू असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



