मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्या बातम्यांचे रिपोर्टिंग कसे केले असते, अशी मांडणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिव्य मराठीच्या या प्रयोगात केली आहे. पुलंनी मराठी माणसाला खळखळून हसवले. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे वृत्तांकन करत आहे. संमेलने साहित्य संस्थांना घेऊ द्या, ते काम सरकारचे नाही अंतू बर्वा | नाशिक काय म्हणतोस... नाशिकक ‘इश्व’ मराठी संमेलन भरला हा? अरं, नाशिकक् काय आणि मेल्या कैलासाक् काय... आमचा काय संबंध? पण तिथे त्या व्यासपीठावर श्रीपाद भालचंद्र जोशींनी जे काय ‘तासल्यान’ ना, ते ऐकून अनेकांची तोंडं वाकडी झाली आसतली! जोशी म्हणताहेत, ‘अरे बाबांनो, ही संमेलनं भरवचा काय सरकारचं काम आहे? सरकारनं आपली लोकांची कामं करावीत, हे साहित्याचा लचांड कशाक गळ्यात मारून घेतास?’ बरोबरच की! सरकारक कामं कमी की काय? त्यांना साहित्यात नाक खुपसल्याशिवाय जेवण पचत नाही तेच खरे! ते जोशी म्हणताहेत, ‘सरकारला संमेलनं भरवायला 70 कोटी लागतात, आणि आम्ही साध्या साहित्य संस्था 7-8 कोटीत तोच उजेड पाडतो.’ म्हजे विचार करा, वरचे 60-62 कोटी गेले कुठे? ‘भुर्रर्र’ करून उडाले की काय? की कोणाच्या खिशातल्या भगदाडात पडले? आणि साहित्य संमेलनास मात्र फक्त २ कोटींची तावडी फेकून मारता. म्हणजे आमचाच माल अन् आमचेच हाल असेच झाले की हे. आमचे सामंत साहेब आणि प्रशासन जागरूक आहेत असे प्रमाणपत्रही दिलंय हो जोशींनी. पण जोशींचा मूळ मुद्दा काय, आम्ही जे मागितच नाही तेच सरकार आमच्या ताटात वाढतं हा! उद्या सरकार म्हणेल, ‘आम्ही तुमची अंत्ययात्रासुद्धा काढून देऊ’, अरे पण आम्हाला मरायचेच नसेल तर? कुसुमाग्रजांच्या ‘नवलाख तळपती दीप विजेचे’ या कवितेप्रमाणेच नाशिकच्या साहित्यपीठावर अ. भा. साहित्य संमेलनाचे ३ माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, उत्तम कांबळे, डॉ. सदानंद मोरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या प्रारंभाची ज्योत प्रज्वलित केली. अशा दुर्मिळ प्रसंगाला नाशिककरांनी उभे राहून दाद दिली. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा त्या बोलीभाषांचा काय? तर जोशी साहेब म्हणताहेत, मराठीतले सगळे शब्द मुळात बोलीतूनच आलेत. जोपर्यंत तुम्ही बोलीभाषांना प्रतिष्ठा देत नाही, तोवर 90 टक्के व्यवहार साहित्याच्या बाहेरच राहील. तो मराठीत येईलच कसा? अभिजात दर्जा मिळाला तो प्राकृताला, सरकाराने काय केले? फक्त सह्या? पण दर्जा मिळाला हे महत्त्वाचे. यामुळे प्रत्येक मराठी माणसाला आपल्याला सगळ्यांनाच कायतरी मिळाल्यासारखा वाटते हो... पण मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा म्हणजे झाले!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel




Become our partner and turn referrals into revenue—join now!