
Kalyan : मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून मेट्रोचं काम सुरूये. मेट्रोच्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशातच कल्याण शिळ रोडवरून प्रवास करण्यांसाठी एक महत्वाची बातमी. कल्याण शिळ रोड पुढील २० दिवसांसाठी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ११ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात मेट्रोचं काम सुरू आहे. दरम्यान, कल्याण शिळ रोडवर मेट्रो १२ चं गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे. या मेट्रोच्या कामासाठी रस्ता पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत काही विशेष बदल जाहीर केले आहेत.
येत्या ११ ते २० ऑगस्ट कल्याण शिळ रोड बंद असणार आहे. रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत कल्याणच्या दिशेनं येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड आणि हलक्या वाहनांना प्रवास करण्यास बंदी आहे. या वाहनांना मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक या रस्त्यावर प्रवेश बंदी असेल. तसेच २१ ते ३१ ऑगस्टदरम्यान, रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत शिळ रोडच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना सुयोग हॉटेल, रिजेन्सी अनंतम चौक येथेही प्रवेश दिला जाणार नाही.
पर्यायी मार्ग कोणते?
मेट्रोची कामे वेळेत पूर्ण आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २० दिवस हा रस्ता बंद असेल. त्यामुळे बाय रोड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. या काळात प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, आधीच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या कल्याण आणि डोंबिवलीकरांना, कल्याण शिळ रोड बंद केल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




