काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाइलवर रमजानच्या शुभेच्छांचे संदेश उमटू लागले. परंतु या सर्व आत्मीय शुभेच्छांच्या दरम्यान दोन अशा चित्रफितीदेखील होत्या, ज्यांना अल्गोरिदम खाली ढकलू शकला नाही. पहिली, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे एका समुदायाला या थराला जाऊन छळण्याचे आवाहन की, ते केवळ राज्यच नव्हे, तर देश सोडण्यास बाध्य होतील. दुसरी, 28 सेकंदांची एक चित्रफीत, ज्यात बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात धार्मिक पृथक्करणाचे आवाहन करतात. खरंच, आपण कोणत्याही प्रकारच्या घटनात्मक नैतिकतेपासून किती दूर भरकटलो आहोत! पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत, तेव्हा राजकीय वक्तव्ये अधिक विखारी होत जातील. मुस्लिम समुदाय अनेकदा जातीय हल्ल्यांचे लक्ष्य राहिला आहे. परंतु आज मला या समुदायातील एका उप-समुदायावर - दाऊदी बोहरा शिया इस्माइली मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 20 कोटी आहे. यापैकी पाच लाख दाऊदी बोहरा आहेत. ‘बोहरा’ हा शब्द गुजराती शब्द ‘वोहरवू’ किंवा ‘व्यवहार’ यावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘व्यापार करणे’ असा होतो. बोहरा हा प्रामुख्याने व्यापारी समुदाय आहे. जगभरातील त्यांच्या सदस्यांचा साक्षरता दर जवळजवळ 100 टक्के आहे. संख्या कमी असूनही तो एक पुरोगामी समुदाय आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न इतर मुस्लिमांच्या तुलनेत अधिक आहे. भारतातील बोहरांपैकी सुमारे अर्धे लोक गुजरातेत राहतात. पंतप्रधान त्यांची गुजराती भाषा बोलतात. जेव्हा संसदेत वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले, तेव्हा त्याच्या काही दिवसांनंतरच पंतप्रधानांनी बोहरा समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला होता. या समुदायाच्या शिष्टमंडळाने वक्फ कायद्याची प्रशंसा केली होती. यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला की भारतातील मुस्लिम या कायद्याचे समर्थन करतात. वास्तविक ही वस्तुस्थिती कुणापासून लपलेली नाही की वक्फ दुरुस्ती कायदा 2025 मुळात संघराज्य संरचना आणि अल्पसंख्याकांच्या हिताच्या विरोधात आहे. बिगर-रालोआ पक्षांच्या (ज्यामध्ये तृणमूल, काँग्रेस, एआयएमआयएम, सपा, द्रमुक, राजद यांचा समावेश आहे) मुस्लिम आणि बिगर-मुस्लिम खासदारांनी या विधेयकाला त्याच्या मूळ आधारावर आव्हान दिले आहे. येथे मनोरंजक बाब अशी आहे की, दाऊदी बोहरांच्या प्रतिनिधींनी 1923 मध्येच त्यांना मुसलमान वक्फ कायद्यातून वगळले जावे असे म्हटले होते. त्यांचा तर्क होता की बोहरा समुदाय अल-दाई अल-मुतलक यांच्यावर श्रद्धा ठेवतो, जे समुदायाच्या सर्व मालमत्तेचे एकमेव विश्वस्त आहेत. समुदायाला वाटते की त्यांच्या सदस्यांना स्वतःच्या मान्यतांनुसार मालमत्तेची स्थापना आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची परवानगी दिली जावी. वक्फ दुरुस्ती कायद्याद्वारे प्रस्तावित वक्फ बोर्ड या स्वायत्ततेला आव्हान देते. अशा परिस्थितीत प्रश्न विचारला जाऊ शकतो की, ज्या विधेयकाला समुदायाचा ऐतिहासिक विरोध राहिला आहे, त्याचे समर्थन करण्यासाठी आणि पंतप्रधानांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ का तयार झाले? देशातील अल्पसंख्याकांप्रति उघडपणे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कट्टरता, पक्षपात आणि पूर्वग्रहाच्या तुलनेत भाजपची ही रणनीती अधिक सूक्ष्म म्हणता येईल. गेल्या दशकातील घटनांचे बारकाईने निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येते की, भाजप शांतपणे अल्पसंख्याकांना एकमेकांविरुद्ध उभे करू इच्छितो. तो या गटांच्या अंतर्गत प्रकरणांमधील विसंगती ओळखतो आणि त्यामध्ये मदतीचा हात देतो, जेणेकरून व्यापक स्तरावर वादग्रस्त असलेल्या मुद्द्यांवर त्यांचे समर्थन मिळवता येईल. इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या राहते. 2011 च्या जनगणनेनुसार हा समुदाय देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 15% आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या चिन्हावर निवडून आला असेल. गुलाम अली राज्यसभेत ‘नामांकित’ श्रेणीतील 12 सदस्यांपैकी एक होते. सहा महिन्यांच्या आत त्यांनी सभापतींना पत्र लिहून स्वतःला भाजप सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्याची विनंती केली होती. परंतु उत्तर प्रदेशात सुमारे चार कोटी मुस्लिम आहेत, जे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहेत, तरीही 403 सदस्यीय विधानसभेत भाजपचा एकही मुस्लिम आमदार नाही. ते शक्य तरी कसे होते! भाजपने कोणत्याही मुस्लिमाला उमेदवारीच दिली नव्हती. दुसरीकडे 8% हिंदू लोकसंख्या असलेल्या बांगलादेशकडे पाहा, ज्याने नुकताच हिंदू समुदायातून एक मंत्री निवडला आहे (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या दशकातील घटना काय सांगतात?इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडून आला असेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
