काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाइलवर रमजानच्या शुभेच्छांचे संदेश उमटू लागले. परंतु या सर्व आत्मीय शुभेच्छांच्या दरम्यान दोन अशा चित्रफितीदेखील होत्या, ज्यांना अल्गोरिदम खाली ढकलू शकला नाही. पहिली, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे एका समुदायाला या थराला जाऊन छळण्याचे आवाहन की, ते केवळ राज्यच नव्हे, तर देश सोडण्यास बाध्य होतील. दुसरी, 28 सेकंदांची एक चित्रफीत, ज्यात बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात धार्मिक पृथक्करणाचे आवाहन करतात. खरंच, आपण कोणत्याही प्रकारच्या घटनात्मक नैतिकतेपासून किती दूर भरकटलो आहोत! पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत, तेव्हा राजकीय वक्तव्ये अधिक विखारी होत जातील. मुस्लिम समुदाय अनेकदा जातीय हल्ल्यांचे लक्ष्य राहिला आहे. परंतु आज मला या समुदायातील एका उप-समुदायावर - दाऊदी बोहरा शिया इस्माइली मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 20 कोटी आहे. यापैकी पाच लाख दाऊदी बोहरा आहेत. ‘बोहरा’ हा शब्द गुजराती शब्द ‘वोहरवू’ किंवा ‘व्यवहार’ यावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘व्यापार करणे’ असा होतो. बोहरा हा प्रामुख्याने व्यापारी समुदाय आहे. जगभरातील त्यांच्या सदस्यांचा साक्षरता दर जवळजवळ 100 टक्के आहे. संख्या कमी असूनही तो एक पुरोगामी समुदाय आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न इतर मुस्लिमांच्या तुलनेत अधिक आहे. भारतातील बोहरांपैकी सुमारे अर्धे लोक गुजरातेत राहतात. पंतप्रधान त्यांची गुजराती भाषा बोलतात. जेव्हा संसदेत वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले, तेव्हा त्याच्या काही दिवसांनंतरच पंतप्रधानांनी बोहरा समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला होता. या समुदायाच्या शिष्टमंडळाने वक्फ कायद्याची प्रशंसा केली होती. यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला की भारतातील मुस्लिम या कायद्याचे समर्थन करतात. वास्तविक ही वस्तुस्थिती कुणापासून लपलेली नाही की वक्फ दुरुस्ती कायदा 2025 मुळात संघराज्य संरचना आणि अल्पसंख्याकांच्या हिताच्या विरोधात आहे. बिगर-रालोआ पक्षांच्या (ज्यामध्ये तृणमूल, काँग्रेस, एआयएमआयएम, सपा, द्रमुक, राजद यांचा समावेश आहे) मुस्लिम आणि बिगर-मुस्लिम खासदारांनी या विधेयकाला त्याच्या मूळ आधारावर आव्हान दिले आहे. येथे मनोरंजक बाब अशी आहे की, दाऊदी बोहरांच्या प्रतिनिधींनी 1923 मध्येच त्यांना मुसलमान वक्फ कायद्यातून वगळले जावे असे म्हटले होते. त्यांचा तर्क होता की बोहरा समुदाय अल-दाई अल-मुतलक यांच्यावर श्रद्धा ठेवतो, जे समुदायाच्या सर्व मालमत्तेचे एकमेव विश्वस्त आहेत. समुदायाला वाटते की त्यांच्या सदस्यांना स्वतःच्या मान्यतांनुसार मालमत्तेची स्थापना आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची परवानगी दिली जावी. वक्फ दुरुस्ती कायद्याद्वारे प्रस्तावित वक्फ बोर्ड या स्वायत्ततेला आव्हान देते. अशा परिस्थितीत प्रश्न विचारला जाऊ शकतो की, ज्या विधेयकाला समुदायाचा ऐतिहासिक विरोध राहिला आहे, त्याचे समर्थन करण्यासाठी आणि पंतप्रधानांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ का तयार झाले? देशातील अल्पसंख्याकांप्रति उघडपणे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कट्टरता, पक्षपात आणि पूर्वग्रहाच्या तुलनेत भाजपची ही रणनीती अधिक सूक्ष्म म्हणता येईल. गेल्या दशकातील घटनांचे बारकाईने निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येते की, भाजप शांतपणे अल्पसंख्याकांना एकमेकांविरुद्ध उभे करू इच्छितो. तो या गटांच्या अंतर्गत प्रकरणांमधील विसंगती ओळखतो आणि त्यामध्ये मदतीचा हात देतो, जेणेकरून व्यापक स्तरावर वादग्रस्त असलेल्या मुद्द्यांवर त्यांचे समर्थन मिळवता येईल. इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या राहते. 2011 च्या जनगणनेनुसार हा समुदाय देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 15% आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या चिन्हावर निवडून आला असेल. गुलाम अली राज्यसभेत ‘नामांकित’ श्रेणीतील 12 सदस्यांपैकी एक होते. सहा महिन्यांच्या आत त्यांनी सभापतींना पत्र लिहून स्वतःला भाजप सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्याची विनंती केली होती. परंतु उत्तर प्रदेशात सुमारे चार कोटी मुस्लिम आहेत, जे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहेत, तरीही 403 सदस्यीय विधानसभेत भाजपचा एकही मुस्लिम आमदार नाही. ते शक्य तरी कसे होते! भाजपने कोणत्याही मुस्लिमाला उमेदवारीच दिली नव्हती. दुसरीकडे 8% हिंदू लोकसंख्या असलेल्या बांगलादेशकडे पाहा, ज्याने नुकताच हिंदू समुदायातून एक मंत्री निवडला आहे (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या दशकातील घटना काय सांगतात?इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडून आला असेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
- नागपुर: माकडांचा उच्छाद! 'ऑरेंज सिटी पार्क'मध्ये ५ दिवसांत ६ हल्ले; महिला आणि फुटबॉलपटू जखमी.
- पुण्यात पाळीव कुत्र्याचा दहशत; १०-१२ जणांना चावा घेतल्याने मालकावर गुन्हा दाखल, नागरिकांकडून कडक नियमांची मागणी.
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
महाराष्ट्र
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
- नागपुर: माकडांचा उच्छाद! 'ऑरेंज सिटी पार्क'मध्ये ५ दिवसांत ६ हल्ले; महिला आणि फुटबॉलपटू जखमी.
- पुण्यात पाळीव कुत्र्याचा दहशत; १०-१२ जणांना चावा घेतल्याने मालकावर गुन्हा दाखल, नागरिकांकडून कडक नियमांची मागणी.
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
गुन्हा
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel



