मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्या बातम्यांचे रिपोर्टिंग कसे केले असते, अशी मांडणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिव्य मराठीच्या या प्रयोगात केली आहे. पुलंनी मराठी माणसाला खळखळून हसवले. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे वृत्तांकन करत आहे. संमेलने साहित्य संस्थांना घेऊ द्या, ते काम सरकारचे नाही अंतू बर्वा | नाशिक काय म्हणतोस... नाशिकक ‘इश्व’ मराठी संमेलन भरला हा? अरं, नाशिकक् काय आणि मेल्या कैलासाक् काय... आमचा काय संबंध? पण तिथे त्या व्यासपीठावर श्रीपाद भालचंद्र जोशींनी जे काय ‘तासल्यान’ ना, ते ऐकून अनेकांची तोंडं वाकडी झाली आसतली! जोशी म्हणताहेत, ‘अरे बाबांनो, ही संमेलनं भरवचा काय सरकारचं काम आहे? सरकारनं आपली लोकांची कामं करावीत, हे साहित्याचा लचांड कशाक गळ्यात मारून घेतास?’ बरोबरच की! सरकारक कामं कमी की काय? त्यांना साहित्यात नाक खुपसल्याशिवाय जेवण पचत नाही तेच खरे! ते जोशी म्हणताहेत, ‘सरकारला संमेलनं भरवायला 70 कोटी लागतात, आणि आम्ही साध्या साहित्य संस्था 7-8 कोटीत तोच उजेड पाडतो.’ म्हजे विचार करा, वरचे 60-62 कोटी गेले कुठे? ‘भुर्रर्र’ करून उडाले की काय? की कोणाच्या खिशातल्या भगदाडात पडले? आणि साहित्य संमेलनास मात्र फक्त २ कोटींची तावडी फेकून मारता. म्हणजे आमचाच माल अन् आमचेच हाल असेच झाले की हे. आमचे सामंत साहेब आणि प्रशासन जागरूक आहेत असे प्रमाणपत्रही दिलंय हो जोशींनी. पण जोशींचा मूळ मुद्दा काय, आम्ही जे मागितच नाही तेच सरकार आमच्या ताटात वाढतं हा! उद्या सरकार म्हणेल, ‘आम्ही तुमची अंत्ययात्रासुद्धा काढून देऊ’, अरे पण आम्हाला मरायचेच नसेल तर? कुसुमाग्रजांच्या ‘नवलाख तळपती दीप विजेचे’ या कवितेप्रमाणेच नाशिकच्या साहित्यपीठावर अ. भा. साहित्य संमेलनाचे ३ माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, उत्तम कांबळे, डॉ. सदानंद मोरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या प्रारंभाची ज्योत प्रज्वलित केली. अशा दुर्मिळ प्रसंगाला नाशिककरांनी उभे राहून दाद दिली. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा त्या बोलीभाषांचा काय? तर जोशी साहेब म्हणताहेत, मराठीतले सगळे शब्द मुळात बोलीतूनच आलेत. जोपर्यंत तुम्ही बोलीभाषांना प्रतिष्ठा देत नाही, तोवर 90 टक्के व्यवहार साहित्याच्या बाहेरच राहील. तो मराठीत येईलच कसा? अभिजात दर्जा मिळाला तो प्राकृताला, सरकाराने काय केले? फक्त सह्या? पण दर्जा मिळाला हे महत्त्वाचे. यामुळे प्रत्येक मराठी माणसाला आपल्याला सगळ्यांनाच कायतरी मिळाल्यासारखा वाटते हो... पण मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा म्हणजे झाले!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
























Subscribe to my channel





Become our partner and turn referrals into revenue—join now!