तसे तर मी नवी दिल्लीतील रस्ते, पुतळे आणि इमारतींमध्ये सरकारने केलेल्या प्रत्येक बदलाचे समर्थन करत नाही. उदाहरणार्थ, राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ का केले गेले, हे मला समजत नाही. मुघल गार्डन्सचे नाव बदलून अमृत उद्यान का केले गेले, हेही मला उमजलेले नाही, कारण ते उद्यान मुघल शैलीतच बांधलेले आहे. परंतु या महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात एडविन लुटियन्सच्या जागी सी. राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले, तेव्हा मला खूप आनंद झाला. लुटियन्स हे नक्कीच एक प्रतिभावान वास्तुविशारद राहिले असतील, पण ते निःसंशयपणे वर्णद्वेषी होते. भारतीयांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा तिरस्कार होता, जो त्यांनी कधीही लपवून ठेवला नाही. याचा सबळ पुरावा 1985 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द लेटर्स ऑफ एडविन लुटियन्स टू हिज वाइफ लेडी एमिली’ या पुस्तकात मिळतो. भारतातील कोणतीही गोष्ट लुटियन्सला प्रभावित करू शकली नव्हती - ना वास्तुकला, ना तत्त्वज्ञान, ना संस्कृती आणि येथील लोकांच्या त्वचेचा रंग तर मुळीच नाही. इंदूरच्या डेली कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना एका वर्णद्वेषी शब्दाने संबोधित केले होते. वाराणसीत त्यांना असे आढळले की येथे ‘सर्व काळे लोक, सर्व प्रकारचे काम करतात’. मद्रासच्या लोकांसाठी तर त्यांनी अधिक अभद्र टिप्पणी केली. त्यांनी लिहिले की, ‘भारताच्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही.’ भारतीय धर्मांत त्यांना कोणतीही बौद्धिकता दिसली नाही. आपल्या खाजगी कर्मचाऱ्यांच्या नावांवरही ते टोमणा मारण्यास विसरले नाहीत. ते म्हणाले, ‘हे लोक त्या सर्व हालचाली करतात, ज्यामुळे कोणताही गोरा साहेब कंटाळू शकतो.’ भारतीय वास्तुकलादेखील त्यांना प्रभावित करू शकली नाही. वाराणसीच्या घाटांच्या काठावरील मंदिरे त्यांना ‘मुलांच्या खेळण्यांमधील झाडांसारखी’ वाटली. कुतुबमिनारची घडण त्यांच्या मते निष्काळजी आणि बेढब होती. मुंबईतील होळकरांचा राजवाडा त्यांना अभद्र व उदयपूरचा राजप्रासाद त्यांना आदिम वाटला होता. ताजमहाललाही त्यांनी नाकारले. तो ग्रीक व रोमन कलाकृतींच्या जवळपासही टिकत नाही, असे म्हटले. शिल्पकारांबद्दल त्यांची टिप्पणी होती की, ‘यांना ओबडधोबड नमुने व देवमूर्ती बनवण्याशिवाय काहीच येत नाही.’ एका बांधकामाच्या अंतिम टप्प्यात कामाची पाहणी करताना त्यांनी लिहिले की, ‘निष्काळजी भारतीय नेहमीप्रमाणे गोष्टी वाया घालवत होते आणि गोंधळ पसरवत होते.’ त्यांना आपल्या पत्नीसाठी बुद्धमूर्ती खरेदी करायची होती, पण त्यांना काहीही दर्जाच्या अनुरूप वाटले नाही. त्यांनी लिहिले - ‘हे देवा, येथे सर्व काही किती कुरूप आहे!’ इतकेच काय, राष्ट्रपती भवनाचा भव्य घुमटदेखील लुटियन्सने अशा प्रकारे कल्पिला होता की, तो ‘ब्रिटिश सैनिक, अधिकारी, मिशनरी किंवा व्हाइसरॉयच्या टोपी घातलेल्या डोक्याची प्रतिमा’ निर्माण करेल, तर लुटियन्सचे समर्थक याला भारतीय वास्तुकलेतून प्रेरित असल्याचे सांगतात. या सर्व अवतरणांवरून स्पष्ट होते की, आपण भारतीय आणि आपल्या महान सभ्यतेबद्दल लुटियन्सची वृत्ती एका अशिक्षित, दुष्ट बुद्धीच्या आणि वर्णद्वेषी व्यक्तीसारखी होती. अशा परिस्थितीत खुद्द राष्ट्रपती भवनात लुटियन्सचा पुतळा असणे हे आपल्या वसाहतवादी विस्मृतीचे एक दयनीय प्रतीक होते. हे पूर्णपणे योग्य आहे की आता लुटियन्सचा पुतळा हटवून त्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर-जनरल होते. राजाजी हे एक सच्चे गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांना मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रीमियर, पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून व्यापक राजकीय-प्रशासकीय अनुभव होता. ते विचारवंत आणि लेखकही होते. त्यांचे साहित्यिक योगदान - ज्यात रामायण आणि महाभारताच्या अनुवादांपासून ते संस्कृती आणि राजकारणावरील वैचारिक निबंधांपर्यंतचा समावेश आहे - भारतीय बौद्धिक परंपरेला अधिक समृद्ध करते. आपण असे प्रजासत्ताक आहोत, ज्याला आपली सार्वजनिक स्मृती आपल्याच मातीत रोवायची आहे. आपण सरकारचे या निर्णयासाठी अभिनंदन करायला हवे, जो निर्णय वसाहतवादी इमारती बांधणाऱ्याच्या ऐवजी राष्ट्राच्या अंतर्मनाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या स्मृतीला समर्पित आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लुटियन्स दिल्लीचा एक पैलू हादेखीलहे पूर्णपणे योग्य आहे की, लुटियन्सचा पुतळा हटवून त्या सी. राजगोपालाचारी यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर जनरल होते. ते एक सच्चे गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




