ध्यान करायचे नसते, ध्यान लावायचे नसते. तर ध्यान सहज घडत असते. आपल्या रोजच्या घाईच्या जीवनात वेळ कुठे आहे की ध्यान केले जाईल? ध्यानासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही.आपले जे काही काम आहे, ते पूर्ण लक्ष केंद्रित करुन, इतर गोष्टींचा विसर करुन करणे हेच सहज ध्यान. जी कृती प्रवृत्ती चालू आहे ती संपूर्ण लक्षपूर्वक, मौन साधून करत असताना वास्तविक ध्यानमग्नतेचा अभ्यास होईल. मग काही करत नसताना या अवस्थेत जाणे हे खरे ध्यान घडेल. जे मुद्दाम करावे लागले ते ध्यान कसे? निष्क्रियता ध्यान नक्कीच नाही. संपूर्ण सक्रियता हे ध्यान आहे. आपल्यात अनंत अशी आत्मशक्ती आहे, ती ऊर्जा आत्म-समृधीच्या दिशेने संपूर्ण सक्रीय करणे हेच उत्कृष्ट ध्यान असेल. लक्ष केंद्रित करणे किंवा ध्यान हे सकारात्मक असावे. विकृती किंवा जे आत्म्याचे स्वभाव नाहीत ( विभाव आहेत ),जीवाचे मूळ लक्षण नाहीत अशा गोष्टीत माणसाला लोभ, मोह,आवड आणि उत्साह असतो. मूळ आत्मस्वरूपाला विकृत करणाऱ्या अशा गोष्टींमध्ये निरस राहणे, रस,आवड न ठेवणे याचा अभ्यास, हीच ध्यानाची प्रारंभिक तयारी. आपण आपल्यात असणे, आत्म स्वभावांत रममाण असणे, स्व-केंद्रीत असणे, आपल्या एक स्व-आत्म्याशिवाय इतर जे काही आहे ते सर्व भौतिक जगातील पदार्थ, यांनाच 'पर' असे म्हटले आहे. यात आपले स्वतःचे शरीरही आले. वास्तविक पाहता ' ध्यान ' ही सर्वोत्कृष्ट शुद्ध आत्म अवस्था प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जीवाला,आत्म्याला, आत्मशक्तीला विकृत करणारी जी तत्व आहेत जसे की क्रोध, मान,माया, लोभ, मोह, दंभ,मत्सर, अत्याधिक इंद्रिय विषय लोलुपता यांचा अभाव करुन आत्म्याच्या मूळ शब्द स्वभावाची प्राप्ती विशिष्ट साधनेतून केली जाते. यासाठी सर्वप्रथम एकाग्रता साधावी लागते. ही एकाग्रता शरीर स्थिर करून चंचल मनाला आत्मस्थानी केंद्रित करणे अशी असते. शरीर स्थिर करण्यासाठी आसन धारण करणे. शारीरिक अवयवांची चंचलता थांबवणे, शरीरातील आंतरिक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी मुद्रा धारण करणे हे आवश्यक. तसेच चंचल मनाला स्थिर करण्यासाठी प्राणायाम, दीर्घश्वास, तणाव मुक्तीचे प्रयोग अशा प्रक्रिया असतात. या सर्व पूर्व तयारीलाच ध्यान समजणे अत्यंत चुकीचे आहे. परंतु दुर्दैवाने अशीच धारणा बहुसंख्य लोकांमध्ये आज रूढ आहे. स्व केंद्रीत असणे याचाच अर्थ असा की गतकाळाच्या स्मृती नको, भविष्यकाळातील चिंता आणि कल्पना नको. मग उरतो तो मात्र केवळ फक्त वर्तमान. या वर्तमान क्षणाला पकडून मनात कुठलेही विकार न ठेवता शुद्ध आणि मूळ आत्मिक स्वरूपाच्या प्राप्तीसाठी एकाग्र होणे हेच तर ध्यान आहे. हे ध्यान साधत असताना शरीरामध्ये अनेक ऊर्जा उत्पन्न होतात, त्यातच काहीतरी साध्य झाल्याची प्रचिती येत असते. त्याला सिद्धी असेही म्हणतात. या सिद्धीकडे फारसे लक्ष द्यायचे नसते. आपला मुख्य उद्देश शुद्ध स्वरूपात आत्मस्वरूप विकसित करणे हा कधीच विसरायचा नसतो. ध्यान केल्याने, ध्यान उत्पन्न झाल्याने आणि ध्यान साधल्याने आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अंतर्गत असलेल्या अनेक शक्तींचे उद्घाटन होते जसे की अनंत ज्ञान, अनंत दर्शन , अनंत शक्ती आणि अनंत चारित्र्य. यासह आपला शुद्ध आत्मा विराजमान होणे हेच ध्यानाचे परमसाध्य आहे. हीच सिद्ध अवस्था. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
महाराष्ट्र
- यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- कोल्हापूर: गोकुळ निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचे स्पष्ट जाहीर करूनही एवढा त्रास का? मंत्री हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक सवाल!
- कोल्हापूर: बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून तब्बल १०० कोटींहून अधिक रक्कम विविध बँकांत वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!





























Subscribe to my channel




