काही तारखा अविस्मरणीय ठरतात. कारण त्या दिवशी काही विलक्षण घटना घडलेली असते म्हणून नव्हे, तर त्या समाजाला माणुसकीची जाणीव करून देतात म्हणून. 20 जुलै ही अशीच एक तारीख आहे. हे वाचताना तुम्हाला एका घटनाक्रमाचे स्मरण होत असले तरीही त्याकडे मी नंतर येईन. पण त्याआधी तुम्हाला 20 जुलै 2024 या दिवशीच्या आयआयटी कानपूरमध्ये घेऊन जातो. खरे तर या कथेची सुरुवात खूप आधी झाली होती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. एच.सी. वर्मा यांनी तिची बीजे पेरली होती. त्यांचा विश्वास होता की, अगदी छोटेसे योगदानही असामान्य बदल घडवू शकते. आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक एमेरिटस राहिलेले प्रा. वर्मा यांनी 1994 ते 2017 या काळात तेथे भौतिकशास्त्र शिकवले. त्यानंतर त्यांनी कॅम्पसमधील अपॉर्च्युनिटी स्कूलमध्ये विशेष सल्लागार म्हणून काम केले. 1964 मध्ये स्थापन झालेली ही शाळा कॅम्पसमध्ये राहणाऱ्या सहायक कर्मचाऱ्यांच्या तसेच आसपासच्या गरजू कुटुंबांतील मुलांना मोफत शिक्षण देत आहे. यांपैकी अनेक मुले उपाशीपोटी शाळेत येत होती. काही प्रार्थनेसाठी उभी असताना बेशुद्ध पडत. काहींचे अभ्यासात मन लागत नसे किंवा ती शाळेतच येत नसत. कारण उपाशीपोटी शिक्षण घेणे अशक्य असते. प्रा. वर्मा यांना ही परिस्थिती बदलायची होती. 2017 मध्ये त्यांच्या मनात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलांना पौष्टिक आहार देण्याची कल्पना प्रथम आली. मात्र निधी उभारणीवरील मतभेदांमुळे ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. 2024 मध्ये या कल्पनेवर पुन्हा चर्चा झाली. त्या वेळी दुसरी अडचण अशी होती की, स्वयंसेवी संस्थेने जितके विद्यार्थी अपेक्षित धरले होते तितके त्या शाळेत नव्हते. पण हार न मानता आयआयटी समुदायाने स्वतःच मार्ग शोधला. एअरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक टी.के. गुहा, जे हॉल-5चे वॉर्डनही होते. यांनी मेस व्यवस्थापक अंशू जोशी यांच्या मदतीने एक सोपा उपाय शोधला. हॉल-5मधील प्रत्येक विद्यार्थी आपल्या खिशातील खर्चातून दर आठवड्याला फक्त 5 रुपये देईल असे ठरले. आणि 20 जुलै 2024 रोजी मुलांना पहिले पौष्टिक जेवण देण्यात आले. सुरुवातीला हा एक छोटासा प्रयोग वाटत होता. पण लवकरच त्याचे मोहिमेत रूपांतर झाले. नोव्हेंबर 2024 पर्यंत हॉल-1, 3 आणि 8 तसेच गर्ल्स होस्टेल-1ही या उपक्रमात सहभागी झाले. त्यामुळे मुलांना आठवड्यातील पाचही शालेय दिवशी पौष्टिक आहार मिळू लागला. स्टुडंट्स जिमखाना आणि होस्टेल अफेअर्सच्या कौन्सिल ऑफ स्टुडंट्सच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती पसरत गेली आणि अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होत गेले. आज आयआयटी कानपूरमधील 1,649 विद्यार्थी दर आठवड्याला 5 रुपयांचे योगदान देतात. यामागचे गणित अतिशय सोपे आहे. सुमारे 250 मुलांना एका वेळचे पौष्टिक जेवण देण्यासाठी सुमारे 3 हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेसच्या मासिक बिलात फक्त 20 रुपयांची वाढ होते. तांदूळ, गहू, हरभरा आणि राजमा यांसारख्या वस्तूंची घाऊक खरेदी केल्यामुळे खर्च कमी राहतो आणि हा उपक्रम टिकाऊ ठरतो. मात्र या उपक्रमाचे खरे फायदे पैशांत मोजता येत नाहीत. शिक्षकांनी पाहिले की, मुले अधिक निरोगी, उत्साही आणि अभ्यासाकडे लक्ष देणारी झाली. त्यांची उपस्थिती सुधारली आणि ती अधिक आनंदी राहू लागली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक धडा शिकला. तो कोणतेही पुस्तक शिकवू शकत नाही. आपल्या वाट्यातील अगदी छोटासा वाटाही इतरांसोबत वाटला तरी तो दुसऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आता पुन्हा 20 जुलै 2026 कडे वळूया. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत देशभरातील अनोळखी लोकांनी अन्न पोहोचवले. त्यासाठी पैसे कोणी दिले हे कुणालाही माहीत नव्हते. अन्न पाठवणाऱ्यांनाही ते कोणी खाल्ले हे माहीत नव्हते. पण कोणताही गाजावाजा न करता अन्न सतत पोहोचत राहिले. जणू करुणेने स्वतःच आपला मार्ग शोधला होता. या दोन्ही कथांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. कदाचित चांगुलपणाचे कार्यही असेच चालते. आपण केलेली भलाई कदाचित त्याच स्वरूपात आपल्याकडे कधीच परत येत नाही. फंडा असा की दयेतून केलेल्या छोट्याशा कृतीलाही कमी लेखू नका. चांगल्या कर्मांचे परत येण्याचे स्वतःचे मार्ग असतात. ती थेट आपल्यापर्यंत पोहोचली नाही तरी नंतरच्या पिढीच्या आयुष्यात नक्कीच परतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



