शुक्रवारी मी बेंगळुरूमधील सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या त्या रस्त्यावरून जात होतो. येथे बायोकॉन पार्क, मायक्रो लॅब्स लिमिटेड, एपोटेक्स रिसर्च, एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सेझ संकुल, कार्ल झाइस इंडिया, सॅनसेरा इंजिनिअरिंग आणि टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया यांसारख्या शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तेवढ्यात माझ्या चुलत भावाचा फोन आला. तो म्हणाला, “अरे, अरविंद (त्याचा मुलगा, नुकताच 17 वर्षांचा झाला आहे) कॉलेजला जाण्यासाठी दुचाकी मागत आहे.’ मी त्याला विचारले, “यात अशी कोणती चिंतेची गोष्ट आहे की याबाबत तुला माझे मत हवे आहे?’ तो म्हणाला, “तो अजून वरच्या मजल्यावरून खाली कपड्यांची टोपलीही न पडता आणू शकत नाही, पण दुचाकी मागतो आहे. कदाचित त्याच्या मित्रांकडे दुचाकी आहेत, त्यामुळे त्याच्यावर समवयस्कांचा दबाव आहे.’ मी त्याला म्हटले, “मी थोड्या वेळाने फोन करतो,’ आणि फोन ठेवला. अवघ्या 20 मिनिटांचा तो प्रवास मला एक तासात पूर्ण करावा लागला. माझ्या पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेल्या भागांपासून वाचण्याचा प्रयत्न करूनही सतत धक्के बसत होते. बोम्मासंद्रा-जिगनी लिंक रोडवरील खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यावरून वाट काढणारे असंख्य दुचाकीस्वार पाहून माझ्या मनात काही धडे आले. ते मी अरविंदच्या पालकांसोबत शेअर करू शकलो असतो. यापैकी काही धडे मला माझ्या वडिलांनी दिले. काही मी स्वतः वाहन चालवताना शिकलो आणि काही इतर दुचाकीस्वारांकडून शिकायला मिळाले. स्वतःची प्रतिमा जपण्याचा मोह सोडा रस्त्यावर उतरल्यावर अनेक दुचाकीस्वारांना वाटते की, त्यांनी एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व, पेहराव, वागणूक, विचार करण्याची पद्धत आणि बोलण्याची शैली स्वीकारली पाहिजे. पण मी माझ्या नव्या दुचाकीवर पहिल्यांदा बसलो तेव्हा वडिलांनी मला सांगितले, “दुचाकीस्वार म्हणून तुला यापैकी कशाचीही गरज नाही.’ ते सहजपणे म्हणाले, “तू कसा दिसायला हवा हा विचार सोड. तेव्हाच तू जो होऊ शकतोस किंवा जो आधीपासून आहेस त्याला जागा मिळेल.’ हँडलवरील पकड थोडी सैल ठेवा त्यांचा दुसरा धडा असा होता की, “तू सतत ताणून राहिलास तर आयुष्यही तणावाने भरलेले राहील.’ दुचाकी सुरू करताना खांदे सैल सोड. त्यामुळे हँडलवरील पकड सहज राहील आणि पुढे जाणे सोपे होईल. रस्त्यात खड्डे आणि खराब भाग येणारच, त्यामुळे अनेकदा अचानक दिशा बदलावी लागू शकते. हँडल घट्ट पकडशील तितके ते कठीण होईल. नंतर मला जाणवले की, हा सल्ला केवळ दुचाकी चालवण्यासाठी नव्हता, तर आयुष्याच्या अनेक पैलूंनाही लागू पडणारा होता. प्रत्येक दुचाकीस्वाराची काळजी घ्या दुचाकी चालवायला सुरुवात करण्यापूर्वी मला ‘बायकर वेव्ह’ बद्दल माहिती नव्हती. दोन दुचाकीस्वार एकमेकांकडे दोन बोटे उंचावून अभिवादन करतात, त्या संकेताला ‘बायकर वेव्ह’ म्हणतात. पण त्याचा अर्थ समजल्यावर मला तो खूप आवडला. कारण तो केवळ अभिवादन नसून सुरक्षित राहण्याचा सार्वत्रिक संदेश आहे. हा छोटासा इशारा सुरक्षित वाहनचालकाची आठवण करून देत राहतो. वाहन चालवतानाही श्वसनाचा सराव करा अनेक अनुभवी वाहनचालकांनी मला सांगितले आहे की, ते वाहतूक सिग्नलवर हिरव्या दिव्याची वाट पाहताना श्वसनाचे व्यायाम करतात. सिग्नलवर उरलेल्या सेकंदांनुसार ते हा सराव करतात. कारचालकांच्या तुलनेत दुचाकीस्वार अनेकदा इतक्या घाईत असतात की, अशा मूलभूत गोष्टी विसरून जातात. लक्षात ठेवा, हे आपल्या शरीरासाठी चांगले असते. मन शांत ठेवते. ती सुरक्षित वाहन चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फंडा असा आहे की, तुमचे मूल दुचाकीची मागणी करत असेल तर त्याच्या मागणीचा नक्की विचार करा, पण हेल्मेट घालण्याची आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिकवण देण्याबरोबरच त्याला आयुष्यात उपयोगी पडणारी ही तत्त्वेही जरूर शिकवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




