गेली सहा वर्षे जगासाठी अतिशय कठीण होती.कोविड-19 ची महामारी असो किंवा युक्रेन आणिगाझामधील युद्ध, संकटांची मालिका थांबलेली नाही.त्यातच मध्य-पूर्वेत इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरहल्ला करून अनावश्यक युद्ध सुरू केले. त्यामुळे जगआणखी खोल संकटात लोटले गेले. आपणजागतिकीकरणाच्या युगात राहत असल्याने या युद्धाचेआर्थिक समस्या निर्माण केल्या. भारतही त्यापासूनअलिप्त नाही. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्यानेमोठा नकारात्मक परिणाम होत आहे. विकासाचा वेगमंदावला असून महागाई वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने तर ही महागाई आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. भारतीय रुपयाची आजवरची मोठी घसरण आपण पाहतोय. खरे तर, जगातील प्रमुख चलनांमध्ये भारतीय रुपयाचेच मूल्य सर्वात वेगाने घसरले आहे. या युद्धाच्या आर्थिक परिणामांचा भारताला इतकाफटका का बसत आहे? याचे साधे उत्तर असे की- भारताचा पाया मजबूत असला तरी, व्यावसायिक धोरणे आखण्याबाबत आपण फारसे प्रयत्न करताना दिसतनाही. अलीकडेच सहा आठवड्यांच्या भारत दौऱ्यानंतरमी खूप आशावादी होतो. या दौऱ्यात मी अनेक शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांना भेटी दिल्या. माझ्या याप्रवासाची सुरुवात पुणे येथील सिम्बायोसिसच्यानिसर्गरम्य परिसरातील परिषदेने झाली. नंतरचा मुक्कामकोलकात्यात होता. प्रेसिडेंसी कॉलेजसारख्या समृद्धइतिहास असलेल्या संस्थेत व्याख्यान देणे व तिथल्याउत्साही विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधणे हा एकविलक्षण अनुभव होता. कोलकात्याहून मी पुरुलियालागेलो. तिथे फिलिक्स स्कूलच्या विद्यार्थ्यांशी गप्पामारल्या. तिथे ‘डिस्कव्हर द वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्स''हा कार्यक्रम सुरू होता. गणितज्ज्ञ महान महाराज,अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक आणि इतरांची व्याख्यानेऐकण्यासाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थी तिथे आले होते.या आदिवासी भागात ग्रामीण, शहरी विद्यार्थ्यांसोबतअर्थशास्त्र, राजकारण,भूमितीवर चर्चा करताना मनातनवी आशा जागृत झाल्याशिवाय राहत नाही. माझाशेवटचा थांबा दिल्ली होता. तिथे गुरु गोबिंद सिंहकॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी व्याख्यान दिले. तिथे मीदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवतअसतानाचे माझे अनेक जुने विद्यार्थी भेटले. प्रतिभावानविद्यार्थी व उत्साही शिक्षकांना भेटल्यानंतर भारताच्याभविष्याबद्दल मी पुन्हा एकदा आश्वासक झालो. या सर्वठिकाणच्या लोकांशी संवाद साधताना जाणवले की,भारतात प्रचंड मानवी प्रतिभा आणि अफाट क्षमता आहे.मात्र मी सरकारच्या धोरणांकडे व आणि भारतीयअर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीकडे पाहतो, तेव्हा मला चिंतावाटते. जमिनीवर ठोस धोरणे न राबवल्यामुळे आपणअर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान करत आहोत. गेल्यादहा-बारा वर्षांत संशोधन आणि आकडेवारीच्या क्षेत्रातआपण मागे पडत चाललो आहोत. सध्या सर्व लक्षफक्त ‘हेडलाईन-जीडीपी''वर केंद्रित झाले आहे.जीडीपी म्हणजे देशातील सर्व लोकांनी मिळूनकमावलेले एकूण उत्पन्न. पण हे उत्पन्न लोकसंख्येतकशा प्रकारे विभागले गेले आहे, याबद्दल जीडीपीकाहीच सांगत नाही. केवळ दोन-तीन श्रीमंत कुटुंबांचेउत्पन्न प्रचंड वाढले तर जीडीपी वाढलेलाच दिसेल; मगभलेही देशातील मोठी लोकसंख्या बेरोजगार आणिदयनीय अवस्थेत का असेना! म्हणूनच भारतातील नेतेदरडोई उत्पन्न, तरुण पिढीतील बेरोजगारी, शेवटच्या 50टक्के लोकांच्या राहणीमानाबद्दल क्वचितच बोलतानादिसतात. भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वातंत्र्यही गमावतचालला आहे. एकेकाळी भारत अलिप्ततावादीचळवळीचे नेतृत्व करत होता आणि आपल्या बौद्धिकनेतृत्वाचा जगात मोठा आदर होता. माझी तिसरी चिंताउच्च शिक्षणाबद्दल आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्याआयआयटी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सयांसारख्या संस्थांनी देशाला जागतिक दर्जाचे संशोधकदिले. परंतु 75 वर्षांतील उच्च शिक्षणाच्या याकामगिरींचा योग्य सन्मान न राखणे हा देशावर एकप्रकारे अन्यायच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारत सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेरपडेल. आपल्या बौद्धिक वारशाची प्रचितीदेईल आणि लोकशाही तसेचधर्मनिरपेक्षतेच्या आदर्शांमुळे आपल्यालाजगात मान मिळाला होता ते आदर्श पुन्हाप्रस्थापित करेल, अशी मला आशा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




