गेली सहा वर्षे जगासाठी अतिशय कठीण होती.कोविड-19 ची महामारी असो किंवा युक्रेन आणिगाझामधील युद्ध, संकटांची मालिका थांबलेली नाही.त्यातच मध्य-पूर्वेत इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरहल्ला करून अनावश्यक युद्ध सुरू केले. त्यामुळे जगआणखी खोल संकटात लोटले गेले. आपणजागतिकीकरणाच्या युगात राहत असल्याने या युद्धाचेआर्थिक समस्या निर्माण केल्या. भारतही त्यापासूनअलिप्त नाही. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्यानेमोठा नकारात्मक परिणाम होत आहे. विकासाचा वेगमंदावला असून महागाई वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने तर ही महागाई आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. भारतीय रुपयाची आजवरची मोठी घसरण आपण पाहतोय. खरे तर, जगातील प्रमुख चलनांमध्ये भारतीय रुपयाचेच मूल्य सर्वात वेगाने घसरले आहे. या युद्धाच्या आर्थिक परिणामांचा भारताला इतकाफटका का बसत आहे? याचे साधे उत्तर असे की- भारताचा पाया मजबूत असला तरी, व्यावसायिक धोरणे आखण्याबाबत आपण फारसे प्रयत्न करताना दिसतनाही. अलीकडेच सहा आठवड्यांच्या भारत दौऱ्यानंतरमी खूप आशावादी होतो. या दौऱ्यात मी अनेक शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांना भेटी दिल्या. माझ्या याप्रवासाची सुरुवात पुणे येथील सिम्बायोसिसच्यानिसर्गरम्य परिसरातील परिषदेने झाली. नंतरचा मुक्कामकोलकात्यात होता. प्रेसिडेंसी कॉलेजसारख्या समृद्धइतिहास असलेल्या संस्थेत व्याख्यान देणे व तिथल्याउत्साही विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधणे हा एकविलक्षण अनुभव होता. कोलकात्याहून मी पुरुलियालागेलो. तिथे फिलिक्स स्कूलच्या विद्यार्थ्यांशी गप्पामारल्या. तिथे ‘डिस्कव्हर द वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्स''हा कार्यक्रम सुरू होता. गणितज्ज्ञ महान महाराज,अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक आणि इतरांची व्याख्यानेऐकण्यासाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थी तिथे आले होते.या आदिवासी भागात ग्रामीण, शहरी विद्यार्थ्यांसोबतअर्थशास्त्र, राजकारण,भूमितीवर चर्चा करताना मनातनवी आशा जागृत झाल्याशिवाय राहत नाही. माझाशेवटचा थांबा दिल्ली होता. तिथे गुरु गोबिंद सिंहकॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी व्याख्यान दिले. तिथे मीदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवतअसतानाचे माझे अनेक जुने विद्यार्थी भेटले. प्रतिभावानविद्यार्थी व उत्साही शिक्षकांना भेटल्यानंतर भारताच्याभविष्याबद्दल मी पुन्हा एकदा आश्वासक झालो. या सर्वठिकाणच्या लोकांशी संवाद साधताना जाणवले की,भारतात प्रचंड मानवी प्रतिभा आणि अफाट क्षमता आहे.मात्र मी सरकारच्या धोरणांकडे व आणि भारतीयअर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीकडे पाहतो, तेव्हा मला चिंतावाटते. जमिनीवर ठोस धोरणे न राबवल्यामुळे आपणअर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान करत आहोत. गेल्यादहा-बारा वर्षांत संशोधन आणि आकडेवारीच्या क्षेत्रातआपण मागे पडत चाललो आहोत. सध्या सर्व लक्षफक्त ‘हेडलाईन-जीडीपी''वर केंद्रित झाले आहे.जीडीपी म्हणजे देशातील सर्व लोकांनी मिळूनकमावलेले एकूण उत्पन्न. पण हे उत्पन्न लोकसंख्येतकशा प्रकारे विभागले गेले आहे, याबद्दल जीडीपीकाहीच सांगत नाही. केवळ दोन-तीन श्रीमंत कुटुंबांचेउत्पन्न प्रचंड वाढले तर जीडीपी वाढलेलाच दिसेल; मगभलेही देशातील मोठी लोकसंख्या बेरोजगार आणिदयनीय अवस्थेत का असेना! म्हणूनच भारतातील नेतेदरडोई उत्पन्न, तरुण पिढीतील बेरोजगारी, शेवटच्या 50टक्के लोकांच्या राहणीमानाबद्दल क्वचितच बोलतानादिसतात. भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वातंत्र्यही गमावतचालला आहे. एकेकाळी भारत अलिप्ततावादीचळवळीचे नेतृत्व करत होता आणि आपल्या बौद्धिकनेतृत्वाचा जगात मोठा आदर होता. माझी तिसरी चिंताउच्च शिक्षणाबद्दल आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्याआयआयटी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सयांसारख्या संस्थांनी देशाला जागतिक दर्जाचे संशोधकदिले. परंतु 75 वर्षांतील उच्च शिक्षणाच्या याकामगिरींचा योग्य सन्मान न राखणे हा देशावर एकप्रकारे अन्यायच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारत सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेरपडेल. आपल्या बौद्धिक वारशाची प्रचितीदेईल आणि लोकशाही तसेचधर्मनिरपेक्षतेच्या आदर्शांमुळे आपल्यालाजगात मान मिळाला होता ते आदर्श पुन्हाप्रस्थापित करेल, अशी मला आशा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

पोलिस भरती झाल्याचा बनाव करून २६ वर्षीय तरुणाने कुटुंबासह संपूर्ण समाजालाच फसवलं. #pune
रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणारी संतापजनक घटना पुण्यात उघड…
आप्पा बळवंत चौकात भरधाव बसने थेट दुकानात घुसत मोठी खळबळ उडवली.
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




