गेली सहा वर्षे जगासाठी अतिशय कठीण होती.कोविड-19 ची महामारी असो किंवा युक्रेन आणिगाझामधील युद्ध, संकटांची मालिका थांबलेली नाही.त्यातच मध्य-पूर्वेत इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरहल्ला करून अनावश्यक युद्ध सुरू केले. त्यामुळे जगआणखी खोल संकटात लोटले गेले. आपणजागतिकीकरणाच्या युगात राहत असल्याने या युद्धाचेआर्थिक समस्या निर्माण केल्या. भारतही त्यापासूनअलिप्त नाही. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्यानेमोठा नकारात्मक परिणाम होत आहे. विकासाचा वेगमंदावला असून महागाई वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने तर ही महागाई आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. भारतीय रुपयाची आजवरची मोठी घसरण आपण पाहतोय. खरे तर, जगातील प्रमुख चलनांमध्ये भारतीय रुपयाचेच मूल्य सर्वात वेगाने घसरले आहे. या युद्धाच्या आर्थिक परिणामांचा भारताला इतकाफटका का बसत आहे? याचे साधे उत्तर असे की- भारताचा पाया मजबूत असला तरी, व्यावसायिक धोरणे आखण्याबाबत आपण फारसे प्रयत्न करताना दिसतनाही. अलीकडेच सहा आठवड्यांच्या भारत दौऱ्यानंतरमी खूप आशावादी होतो. या दौऱ्यात मी अनेक शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांना भेटी दिल्या. माझ्या याप्रवासाची सुरुवात पुणे येथील सिम्बायोसिसच्यानिसर्गरम्य परिसरातील परिषदेने झाली. नंतरचा मुक्कामकोलकात्यात होता. प्रेसिडेंसी कॉलेजसारख्या समृद्धइतिहास असलेल्या संस्थेत व्याख्यान देणे व तिथल्याउत्साही विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधणे हा एकविलक्षण अनुभव होता. कोलकात्याहून मी पुरुलियालागेलो. तिथे फिलिक्स स्कूलच्या विद्यार्थ्यांशी गप्पामारल्या. तिथे ‘डिस्कव्हर द वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्स''हा कार्यक्रम सुरू होता. गणितज्ज्ञ महान महाराज,अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक आणि इतरांची व्याख्यानेऐकण्यासाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थी तिथे आले होते.या आदिवासी भागात ग्रामीण, शहरी विद्यार्थ्यांसोबतअर्थशास्त्र, राजकारण,भूमितीवर चर्चा करताना मनातनवी आशा जागृत झाल्याशिवाय राहत नाही. माझाशेवटचा थांबा दिल्ली होता. तिथे गुरु गोबिंद सिंहकॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी व्याख्यान दिले. तिथे मीदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवतअसतानाचे माझे अनेक जुने विद्यार्थी भेटले. प्रतिभावानविद्यार्थी व उत्साही शिक्षकांना भेटल्यानंतर भारताच्याभविष्याबद्दल मी पुन्हा एकदा आश्वासक झालो. या सर्वठिकाणच्या लोकांशी संवाद साधताना जाणवले की,भारतात प्रचंड मानवी प्रतिभा आणि अफाट क्षमता आहे.मात्र मी सरकारच्या धोरणांकडे व आणि भारतीयअर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीकडे पाहतो, तेव्हा मला चिंतावाटते. जमिनीवर ठोस धोरणे न राबवल्यामुळे आपणअर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान करत आहोत. गेल्यादहा-बारा वर्षांत संशोधन आणि आकडेवारीच्या क्षेत्रातआपण मागे पडत चाललो आहोत. सध्या सर्व लक्षफक्त ‘हेडलाईन-जीडीपी''वर केंद्रित झाले आहे.जीडीपी म्हणजे देशातील सर्व लोकांनी मिळूनकमावलेले एकूण उत्पन्न. पण हे उत्पन्न लोकसंख्येतकशा प्रकारे विभागले गेले आहे, याबद्दल जीडीपीकाहीच सांगत नाही. केवळ दोन-तीन श्रीमंत कुटुंबांचेउत्पन्न प्रचंड वाढले तर जीडीपी वाढलेलाच दिसेल; मगभलेही देशातील मोठी लोकसंख्या बेरोजगार आणिदयनीय अवस्थेत का असेना! म्हणूनच भारतातील नेतेदरडोई उत्पन्न, तरुण पिढीतील बेरोजगारी, शेवटच्या 50टक्के लोकांच्या राहणीमानाबद्दल क्वचितच बोलतानादिसतात. भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वातंत्र्यही गमावतचालला आहे. एकेकाळी भारत अलिप्ततावादीचळवळीचे नेतृत्व करत होता आणि आपल्या बौद्धिकनेतृत्वाचा जगात मोठा आदर होता. माझी तिसरी चिंताउच्च शिक्षणाबद्दल आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्याआयआयटी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सयांसारख्या संस्थांनी देशाला जागतिक दर्जाचे संशोधकदिले. परंतु 75 वर्षांतील उच्च शिक्षणाच्या याकामगिरींचा योग्य सन्मान न राखणे हा देशावर एकप्रकारे अन्यायच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारत सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेरपडेल. आपल्या बौद्धिक वारशाची प्रचितीदेईल आणि लोकशाही तसेचधर्मनिरपेक्षतेच्या आदर्शांमुळे आपल्यालाजगात मान मिळाला होता ते आदर्श पुन्हाप्रस्थापित करेल, अशी मला आशा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

