महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबतकाही शंका, अटी आणि चिंता असल्या तरीविरोधकांकडून उमटणारे तीव्र सूर हे महिलाआरक्षणाबद्दल नसून मतदारसंघांच्या परिसीमनविधेयकाबाबत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.संसदेच्या विशेष अधिवेशनात ही दोन्ही विधेयकेचर्चेसाठी एकत्र आणली गेल्यामुळे विरोधक महिलाआरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीत अडथळेआणत आहेत, असा समज निर्माण झाला. परंतुखरोखरच ही दोन्ही विधेयके एकत्र आणणे गरजेचेहोते का? महिला आरक्षण आणि पुनर्रचना विधेयक स्वतंत्रपणे मांडून त्यांची अंमलबजावणी करणे शक्यनव्हते का? कदाचित तसे करता आले असते. परंतु ही दोन्हीविधेयके परस्परांशी जोडलेली असल्याने सरकारने ती एकत्र आणण्याचा निर्णय घेतला असावा. 2023 मध्येमंजूर महिला आरक्षण विधेयकात स्पष्टपणे नमूद केलेआहे की, पुढील पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय 33 टक्के आरक्षण लागू करता येणार नाही. ही पुनर्रचनाप्रक्रिया केवळ ताज्या जनगणनेच्या आधारावरच पूर्णहोऊ शकते. अशा प्रकारे लोकसभा आणिविधानसभांमधील जागांचे फेरसमायोजन आणिमतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्याच्या प्रक्रियेवरमहिला आरक्षणाची अंमलबजावणी घटनात्मकरित्याअवलंबून आहे. मागील तरतुदीनुसार महिलांना 33 टक्के आरक्षणदेण्यापूर्वी पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे, हेतर ठीक आहे; पण दोन्ही विधेयके एकत्रित सादरकेल्यामुळे एक संशय निर्माण झाला. स्पष्ट नियमनिश्चित न करता, केवळ महिला आरक्षण विधेयकाचावापर करून पुनर्रचना प्रक्रिया पुढे रेटली जात आहे का,अशी शंका घेतली जात आहे. हा भ्रम निर्माण होण्याचेमुख्य कारण म्हणजे लोकसभेतील संभाव्य जागांचीसंख्या 815 ते 850 पर्यंत वाढवण्याबाबत विविधस्रोतांकडून आलेली वेगवेगळी आकडेवारी.लोकसभेतील जागा वाढवण्यासाठी कोणता फॉर्म्युलावापरला जाईल, याबद्दल स्पष्टता नसल्याने संभ्रमअधिक वाढला. सभागृहात सांगितलेले (प्रत्येकराज्यातील विद्यमान जागांमध्ये 50 टक्के वाढ करणे) तेचर्चेसाठी सादर केलेल्या विधेयकात स्पष्टपणे दिसलेनाही. याव्यतिरिक्त, विद्यमान नियमांनुसार पुढीलपुनर्रचना ताज्या जनगणनेच्या आधारावर होणे अपेक्षितअसताना विधेयकात ती 2011 च्या जनगणनेच्याआधारावर करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. विशेषम्हणजे 2026 च्या जनगणनेची प्रक्रिया आधीच सुरूझाली आहे आणि तंत्रज्ञानामुळे ही आकडेवारी लवकरउपलब्ध होण्याची शक्यता असतानाही असा बदल का,हा प्रश्न उरतोच. सैद्धांतिक पातळीवर महिलाआरक्षणाबाबत कोणताही मोठा विरोध दिसत नसला,तरी त्यातील तरतुदींबाबत चिंता कायम आहे. अनुसूचितजाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी)यांच्या आरक्षणाबाबत स्पष्ट तरतुदी असल्या तरी महिलाउमेदवारांच्या आरक्षणासाठी कोणता निकष लावलाजाईल, यावर पुरेशी स्पष्टता नाही. दलित व आदिवासीसमाजातील महिलांसाठी जागा आरक्षित असतील असेमानले जात असले तरी त्याबाबतचे संशय दूर करणेगरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच ओबीसीमहिलांसाठीही आरक्षणाची मागणी होत आहे. विरोधीपक्षांनी ही चिंता व्यक्त केली आहे की, एससी आणिएसटी आरक्षणाला घटनात्मक आधार असतानासध्याच्या विधेयकात ओबीसी महिलांसाठी कोणतीहीस्पष्ट तरतूद नाही. ओबीसी समुदाय हा देशाच्यालोकसंख्येचा मोठा भाग असल्याने त्यांनाआरक्षणापासून दूर ठेवणे विधेयकाच्या मूळ उद्देशालाबाधा ठरू शकते. त्यामुळे काही विरोधी पक्ष आताघटनादुरुस्ती किंवा धोरणात्मक बांधिलकीची मागणीकरत आहेत. सरकारने व्यापक चर्चेतून या सर्व शंकांचे समाधानकरणे आवश्यक आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये या मुद्द्यावर सहमती झाली तरच पुनर्रचनाप्रक्रियेला नैतिक बळ मिळेल आणि महिलाआरक्षणासारखा महत्त्वपूर्ण विषय अनावश्यक वादाच्याभोवऱ्यात अडकणार नाही. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे .) सत्ताधारी आघाडी आणि विरोधी पक्ष यादोघांमध्ये द्विपक्षीय सहमती होणे केवळमतदारसंघांच्या परिसीम प्रक्रियेला वैधतादेण्यासाठीच नव्हे, तर महिला आरक्षणविनाकारण वादात अडकू नये यासाठीहीआवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

