पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:माणसे बदलत नाहीत, फक्त‎ दडलेला स्वभाव बाहेर येतो!‎

प्रेम, पैसा आणि पद या गोष्टी आयुष्यात हळूहळू आल्या, तर त्या‎पचवणे कठीण जात नाही. पण तीन गोष्टी अचानक आल्यावर गोंधळ‎उडतो. असे म्हटले जाते की, या तीन गोष्टी मिळाल्यावर माणसे‎बदलतात. परंतु आपण अधिक खोलवर विचार केला, तर सत्य काही‎वेगळेच आहे. सत्य हे आहे की, या तीन गोष्टी मिळाल्यावर आपला‎दडलेला स्वभाव व मनाच्या कोपऱ्यातील व्यक्तिमत्वाचा जणू‎स्फोटच होतो. त्यावर संत तुलसीदास यांनी काकभुशुंडी यांच्या‎मुखातून वदवले आहे : ‘श्री मद बक्र न कीन्ह केहि प्रभुता बधिर न‎काहि, मृगलोचनि के नैन सर को अस लाग न जाहि।’ गर्वाने कोणाला‎वाकवले नाही? अधिकाराने कोणाला बहिरे केले नाही? आणि‎मृगनयनी स्त्रीचे बाण कोणाला भेदलेले नाहीत? म्हणजेच मनातील‎काम, क्रोध , लोभ बाहेर येतात व मग माणसाचे वागणे‎बदलल्यासारखे वाटते. म्हणूनच मूळ स्वभावावर काम करा. त्याचे‎दोष दूर करा. समृद्ध करा. ‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *