गेली सहा वर्षे जगासाठी अतिशय कठीण होती.कोविड-19 ची महामारी असो किंवा युक्रेन आणिगाझामधील युद्ध, संकटांची मालिका थांबलेली नाही.त्यातच मध्य-पूर्वेत इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरहल्ला करून अनावश्यक युद्ध सुरू केले. त्यामुळे जगआणखी खोल संकटात लोटले गेले. आपणजागतिकीकरणाच्या युगात राहत असल्याने या युद्धाचेआर्थिक समस्या निर्माण केल्या. भारतही त्यापासूनअलिप्त नाही. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्यानेमोठा नकारात्मक परिणाम होत आहे. विकासाचा वेगमंदावला असून महागाई वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने तर ही महागाई आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. भारतीय रुपयाची आजवरची मोठी घसरण आपण पाहतोय. खरे तर, जगातील प्रमुख चलनांमध्ये भारतीय रुपयाचेच मूल्य सर्वात वेगाने घसरले आहे. या युद्धाच्या आर्थिक परिणामांचा भारताला इतकाफटका का बसत आहे? याचे साधे उत्तर असे की- भारताचा पाया मजबूत असला तरी, व्यावसायिक धोरणे आखण्याबाबत आपण फारसे प्रयत्न करताना दिसतनाही. अलीकडेच सहा आठवड्यांच्या भारत दौऱ्यानंतरमी खूप आशावादी होतो. या दौऱ्यात मी अनेक शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांना भेटी दिल्या. माझ्या याप्रवासाची सुरुवात पुणे येथील सिम्बायोसिसच्यानिसर्गरम्य परिसरातील परिषदेने झाली. नंतरचा मुक्कामकोलकात्यात होता. प्रेसिडेंसी कॉलेजसारख्या समृद्धइतिहास असलेल्या संस्थेत व्याख्यान देणे व तिथल्याउत्साही विद्यार्थी-शिक्षकांशी संवाद साधणे हा एकविलक्षण अनुभव होता. कोलकात्याहून मी पुरुलियालागेलो. तिथे फिलिक्स स्कूलच्या विद्यार्थ्यांशी गप्पामारल्या. तिथे ‘डिस्कव्हर द वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्स''हा कार्यक्रम सुरू होता. गणितज्ज्ञ महान महाराज,अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक आणि इतरांची व्याख्यानेऐकण्यासाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थी तिथे आले होते.या आदिवासी भागात ग्रामीण, शहरी विद्यार्थ्यांसोबतअर्थशास्त्र, राजकारण,भूमितीवर चर्चा करताना मनातनवी आशा जागृत झाल्याशिवाय राहत नाही. माझाशेवटचा थांबा दिल्ली होता. तिथे गुरु गोबिंद सिंहकॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी व्याख्यान दिले. तिथे मीदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवतअसतानाचे माझे अनेक जुने विद्यार्थी भेटले. प्रतिभावानविद्यार्थी व उत्साही शिक्षकांना भेटल्यानंतर भारताच्याभविष्याबद्दल मी पुन्हा एकदा आश्वासक झालो. या सर्वठिकाणच्या लोकांशी संवाद साधताना जाणवले की,भारतात प्रचंड मानवी प्रतिभा आणि अफाट क्षमता आहे.मात्र मी सरकारच्या धोरणांकडे व आणि भारतीयअर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीकडे पाहतो, तेव्हा मला चिंतावाटते. जमिनीवर ठोस धोरणे न राबवल्यामुळे आपणअर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान करत आहोत. गेल्यादहा-बारा वर्षांत संशोधन आणि आकडेवारीच्या क्षेत्रातआपण मागे पडत चाललो आहोत. सध्या सर्व लक्षफक्त ‘हेडलाईन-जीडीपी''वर केंद्रित झाले आहे.जीडीपी म्हणजे देशातील सर्व लोकांनी मिळूनकमावलेले एकूण उत्पन्न. पण हे उत्पन्न लोकसंख्येतकशा प्रकारे विभागले गेले आहे, याबद्दल जीडीपीकाहीच सांगत नाही. केवळ दोन-तीन श्रीमंत कुटुंबांचेउत्पन्न प्रचंड वाढले तर जीडीपी वाढलेलाच दिसेल; मगभलेही देशातील मोठी लोकसंख्या बेरोजगार आणिदयनीय अवस्थेत का असेना! म्हणूनच भारतातील नेतेदरडोई उत्पन्न, तरुण पिढीतील बेरोजगारी, शेवटच्या 50टक्के लोकांच्या राहणीमानाबद्दल क्वचितच बोलतानादिसतात. भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वातंत्र्यही गमावतचालला आहे. एकेकाळी भारत अलिप्ततावादीचळवळीचे नेतृत्व करत होता आणि आपल्या बौद्धिकनेतृत्वाचा जगात मोठा आदर होता. माझी तिसरी चिंताउच्च शिक्षणाबद्दल आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्याआयआयटी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सयांसारख्या संस्थांनी देशाला जागतिक दर्जाचे संशोधकदिले. परंतु 75 वर्षांतील उच्च शिक्षणाच्या याकामगिरींचा योग्य सन्मान न राखणे हा देशावर एकप्रकारे अन्यायच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारत सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेरपडेल. आपल्या बौद्धिक वारशाची प्रचितीदेईल आणि लोकशाही तसेचधर्मनिरपेक्षतेच्या आदर्शांमुळे आपल्यालाजगात मान मिळाला होता ते आदर्श पुन्हाप्रस्थापित करेल, अशी मला आशा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



