गेल्या तीन दशकांपासून प्रत्येक शनिवारची सुरुवात अशीच झाली आहे. डिजिटल अलार्म वाजण्यापूर्वी मी जागा होतो. घर पहाटेच्या आगळ्या मखमली शांततेने वेढलेले असते. मी एक कप फिल्टर कॉफी बनवतो आणि एका शांत कोपऱ्यात बसतो. मंद प्रकाशात फोनद्वारे माझ्या 88 वर्षीय मामांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. त्यांची श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे आमचे गप्पा मारणारे फोन कॉल्स व्हॉट्सॲपच्या शांत, तेजस्वी जगात बदलले आहेत. स्क्रीनचा हलका निळा प्रकाश कुणालाही त्रास देत नाही. अगदी माझ्या पाळीव प्राण्याला नाही. कारण ते अगदी थोड्याशा हालचालीबद्दल संवेदनशील असतात. ते तसेच झोपून राहतात. त्यांच्या नजरेत आम्ही त्या क्षणी जणू ‘काहीही उपयुक्त’ करत नसतो. परंतु आम्ही आमच्या जीवनाला धरून आहोत. आम्हा दोघांनाही केवळ आमचे कुटुंब शारीरिक व भावनिकदृष्ट्या चांगले आहे ना, एवढीच ख्यालीखुशाली जाणून घ्यायची आहे. अनेकदा आम्ही काहीही बोलत नाही तरीही आम्ही सर्व गोष्टींबद्दल बोलतो. त्यांची मुले म्हणजे माझे चुलत भाऊ परदेशात राहतात. ते अनेकदा विनोदाने म्हणतात, त्यांचे वडील माझ्याशी त्यांच्यापेक्षा जास्त बोलतात. ते चिडवतात की मीच त्यांच्या कुटुंबात राहतो. मामा मला 1940 व 50 च्या दशकात घेऊन जातात. माझ्या आईच्या तरुणपणाच्या आठवणी सांगतात. ते तिच्या शाळेत जाण्याचे, स्वयंपाक व शिवणकाम शिकण्याचे, तिच्या करुणेचे वर्णन करतात. त्यांचे शब्द माझ्या आठवणीत कायमचे कोरले जातात. आपली बहीण भावांची कशा प्रकारे दिव्यतेने काळजी घेई हेही त्यांच्याकडून मी ऐकले. त्यांना चांगले जेवण आणि विश्रांती मिळतेय याची खात्री करत असे. भाऊ थकण्यापूर्वीच तिला ते जाणवत होते. मामा 1940 आणि 50 च्या दशकातील आठवणी सांगतात. अगदी मी माझ्या बालपणीच्या आठवणींपर्यंत पोहोचत नाही तोवर. जणू काही आठवणी ऑलिम्पिक टॉर्च रिलेसारख्या एकामागून दुसऱ्याकडे जात असाव्यात. मी अनेकदा शब्दांतून प्रतिसाद देत नाही. मला गरज भासत नाही. स्क्रीनवर ‘ब्ल्यू टिक’ पाहून त्यांना माहीत कळते की मी तिथे आहे. प्रत्येक शब्द आत उतरत आहे. अचानक स्क्रीनवर एक प्रश्न येतो : “तू रडत आहेस का?’ उत्तर देण्यासाठी मला काही सेकंद लागतात. त्यांनी मला रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या भावनिक नाळेमुळे ते अशा जाणिवांना स्पर्श करतात. कदाचित मी हे लपवत होतो. ते त्यांच्या आईच्या भावंडांबद्दलची करुणा आणि त्यागाच्या कथा सांगतात. त्याग आणि वृद्धत्वाच्या वेदना ते कबूल करतात. या भावना कदाचित फोनवर हाताळता येत नाहीत. कधीकधी ते सहा महिन्यांपूर्वी ऐकलेल्या त्याच कथेची पुनरावृत्ती करतात - पण मी त्यांना कधीच थांबवत नाही. ती गोष्ट पुन्हा सांगण्याचा आनंद मी कधीच हिरावून घेऊ इच्छित नाही. आता एक अज्ञात भीती मला घेरते. मी त्यांच्या आजारपणाबद्दल ऐकतो तेव्हा मी सर्वकाही सोडून चेन्नईला प्रवास करतो. माझे चुलत भाऊ बरोबर होते. मी त्यांच्या घराचा एक भाग झालो आहे. पण आल्यावर त्यांना मिठी मारण्याचा आनंद अल्पकाळ टिकतो. कारण आता लवकरच निरोप घ्यावा लागेल, याचे ओझे त्या क्षणी भार टाकणारे ठरते. प्रेमाचा अर्थ नेहमीच जवळ असणे असा नाही; कधीकधी त्याचा अर्थ असा होतो की ते पुन्हा पुन्हा करावे. आम्हाला हे माहीत आहे की एके दिवशी हे सर्व संपेल. मी तयार आहे की नाही हे विचालेही नाही. सध्या तरी हे साधे संभाषण पुरेसे आहे. कधीकधी आमच्या गप्पा नात्यातील भावनेवर व कधी माझ्या आईच्या आठवणींवर आधारित असतात. त्या शांततेच्या विश्वात घेऊन जातात. व्हॅलेंटाइन डे हाच आहे का? मला माहीत नाही.
फंडा असा की- प्रेमाची अनेक रूपे असतात. ते व्यक्त करण्यासाठी क्वचितच एखाद्या भव्य व्यासपीठाची गरज असते. ते विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट पद्धतीने व्यक्त करण्याची गरज नाही. ते कधीही दाखवता येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



